शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात; प्रत्येकी ५० हजारांचा लाभ

By चंद्रकांत शेळके | Updated: January 3, 2024 20:12 IST

अनुदानातून खरेदी करावे लागणार कृषी साहित्य

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे चालू आर्थिक वर्षात ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान या कुटुुंबांना देण्यात येत असून, त्यातून कृषी साहित्य संबंधित शेतकऱ्यांंना खरेदी करता येणार आहे. यात काहींना लाभ दिलेला आहे.

सन २०१७-१८ पासून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडामधून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी प्रतिकुटुंब ५० हजारांची मदत देण्यात येत आहे. सन २०२२-२३ पर्यंत जिल्ह्यातील १३७ कुटुंबांना अशा प्रकारे मदत देण्यात आलेली आहे. यामुळे शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खते, औषधे, औजारे, विद्युत पंप, पी.व्ही.सी. पाइप, दूध काढणी यंत्र, ट्रॅक्टरचलित औजारे खरेदीसाठी अशा कुटुंबांना हातभार लागला आहे.

सन २०२३-२४ या वर्षामध्ये १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी पाच लाखांची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे यातून १० कुटुंबांना मदत देण्यात आली; परंतु जिल्ह्यात ६४ कुटुंब नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रतीक्षा यादीत होते. यातील अधिकाधिक कुटुंब योजनेत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने हवामान केंद्र स्थापन करण्याचा १५ लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवला. त्यामुळे यातून ३० कुटुंब मदतीच्या कक्षेत आले. उर्वरित ३४ कुुटुंबांनाही मदत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याचे नियोजित आहे. अशा प्रकारे सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा समावेश योजनेत झालेला आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.३३३ शेतकऱ्यांना कडबाकुट्टी

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी देण्याच्या योजनेतही चालू आर्थिक वर्षी ३३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी सेस फंडातून प्रथमच ३० लाखांची तरतूद केलेली होती. प्रतिलाभार्थी ९ हजार रुपये यात देण्यात येतात. ३३३ अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंजुरी देऊन लाभ देण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर