शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

दीडशे पटासाठी एक मुख्याध्यापक

By admin | Updated: April 10, 2024 16:05 IST

अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिले ते सातवीपर्यंत दीडशे पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे.

अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार राज्यातील पहिले ते सातवीपर्यंत दीडशे पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे. याबाबतच्या सूचना शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पूर्वी २०० पट असणार्‍या शाळांनाच मुख्याध्यापक पद अस्तित्वात होते. नगर जिल्ह्यात पूर्वीच्या कायद्यानुसार ५६५ मुख्याध्यापकांची पदे होती. या मुख्याध्यापकांना संबंधित शाळेच्या प्रशासकीय कामासोबतच अध्यापन आणि वर्ग सक्तीचा होता. मात्र, बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ मध्ये या मुख्याध्यापकांना अध्यापनाचे काम देऊ नये, अशी सूचना देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेत सध्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. रविवारी जिल्हा पातळीवर अतिरिक्त ठरलेल्या १९० शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदावर पदावनती (दर्जा कमी करणे) करण्यात येणार होता. त्यानंतर तालुकास्तरावर त्यांचे समायोजन आणि सपाटीकरण करण्यात येणार होते. मात्र, शनिवारी उशीरा शिक्षण संचालक माने यांनी १५० पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापक देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने पदावनतीची प्रक्रिया रद्द केली आहे. १५० पट असणार्‍या शाळांची यादी शिक्षण परिषद जिल्हा परिषदेला पाठविणार आहे. त्यानंतर किती मुख्याध्यापकांना पद स्थापना मिळेल, याचा निश्चित आकडा कळेल, अशी माहिती शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी दिली. (प्रतिनिधी) सोमवारपासून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांचे समायोजन होणार आहे. प्रत्येक तालुक्यात गट शिक्षणाधिकारी वेगवेगळे नियम लावून हे समायोजन करत असतात. यासाठी जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाच्या आदेशाकडून सर्व तालुक्यात एकच नियमानुसार समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक नेते संजय कळमकर यांनी केली आहे. ही मागणी शिक्षण विभागाने मान्य केली आहे. यावेळी अनिल आंधळे, राजेंद्र शिंदे, दिलीप दहिफळे आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षण संचालक माने यांनी नवीन कायद्यानुसार १५० पट असणार्‍या शाळांना मुख्याध्यापक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे राज्यात अतिरिक्त ठरणार्‍या मुख्याध्यापकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. -अर्जुन साळवे, प्राथमिक शिक्षण विभाग संघटना समन्वय समिती.