शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आरोग्याधिका-याचे दालन बनले गोडावून; अहमदनगर महापालिकेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:00 IST

महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अशातच महापालिकेच्या दोन आरोग्याधिका-यांच्या कारभारावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका आरोग्याधिका-यांच्या दालनामध्ये दुस-या अधिका-याने चक्क गोडावून करून टाकले.

अहमदनगर : शहरात डेंग्यूसह साथीचे आजार वाढलेले असताना महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अशातच महापालिकेच्या दोन आरोग्याधिका-यांच्या कारभारावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका आरोग्याधिका-यांच्या दालनामध्ये दुस-या अधिका-याने चक्क गोडावून करून टाकले. त्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला असून याकडे मात्र महापालिका आयुक्तांसह अधिकारी व लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.दोन-तीन महिन्यांपूर्वी वैदुवाडी भागातील बाबाजी शिंदे यांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. याला जबाबदार धरून महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना पदावरून हटविले होते. त्यांच्याकडे घनकचरा विभागाचा कार्यभार देण्यात आला. त्यांच्या जागेवर डॉ. सतीश राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. राजूरकर यांच्याकडे पदभार येताच डॉ. बोरगे यांनी त्यांच्या आधीच्या दालनातील सर्व साहित्य इतर ठिकाणी हलविले. या प्रकरणात आयुक्तांनी दोन्ही अधिका-यांना नोटिसा बजावल्या होत्या.  डॉ. बोरगे यांच्या हस्तक्षेपामुळे काम करणे अशक्य असल्याचे डॉ. राजूरकर यांनी म्हटले होते. त्यानंतर डॉ. राजूरकर रजेवर असून त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. बोरगे हेच कारभार पाहत आहेत. आरोग्य विभागासाठी खरेदी केलेले साहित्य शनिवारी महापालिकेत पोहोचले. हे साहित्य थेट वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या दालनात ठेवण्यात आले. हे दालन आता चक्क गोडावून झाले आहे. त्यामुळे डॉ. राजूरकर यांना बसण्यासाठी जागाच उरली नाही. औषधांची खोके असलेल्या दालनात बसून डॉ. राजूरकर कारभार पाहणार का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. आरोग्य अधिकारी पदावर डॉ. सतीश राजूरकर यांची नियुक्ती असली तरी प्रत्यक्षात डॉ. बोरगे हेच काम पाहत आहेत. याबाबत आयुक्तांनीच तोंडी आदेश दिल्याची माहिती आहे. दोन अधिका-यांच्या पदावरून सुरू असलेल्या भांडणात मात्र शहराचे आरोग्य पार बिघडले असून त्यावर आयुक्त आणि लोकप्रतिनिधी कधी आवाज उठविणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्य