शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कुकडीच्या आवर्तनात निम्म्याने कपात

By admin | Updated: December 18, 2015 23:15 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले. मात्र, महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी जलसंपदा विभागाला जम्बो यादी दिली आहे.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले. मात्र, महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी जलसंपदा विभागाला जम्बो यादी दिली आहे. त्यामुळे पाणी परिस्थिती व पिकांना लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने कुकडीच्या आवर्तनात ५० टक्क्याने कपात करून आता फक्त फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम जळून जाणार आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना मृगजळ ठरणार आहे. कुकडीच्या आवर्तनावरून राजकीय नेत्यांनी मोठा गाजावाजा केला. अखेर ३ डिसेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले. ३० दिवसात साडेचार टीएमसी पाणी वापरून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन करण्यासाठी करमाळा, कर्जत तालुक्याला पाणी देण्यात आले. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी टंचाई शाखेची बैठक घेतली आणि नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे तलाव भरण्याचा निर्णय घेतला. प्रचलित तलावात पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास देण्यात आले. जलसंपदा विभागाने पारनेर तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्र, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यासाठी प्रत्येकी १५ हजार हेक्टर व करमाळा तालुक्यासाठी १२ हजार हेक्टर क्षेत्र गृहित धरून आवर्तनाचे नियोजन करुन यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र,गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पिकेही दुप्पट पाणी शोषण करु लागली. अशी परिस्थिती गृहीत धरलेल्या क्षेत्रास पाणी देणे अवघड झाले आहे. पिकांना की तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे, अशी द्विधा मनस्थिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झाली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून फळबागांना पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवून घेतले आहे. कुकडी पाटपाणी कृती समिती सदस्यांनी डी वाय ९ ते १४ या वितरीकांना ३ ऐवजी ७ दिवस पाणी देण्याची मागणी केली आहे. मात्र, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुुभाष कोळी यांनी कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही. यावरुन सुरू असलेले आवर्तन गुंडाळले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.