शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

कुकडीच्या आवर्तनात निम्म्याने कपात

By admin | Updated: December 18, 2015 23:15 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले. मात्र, महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी जलसंपदा विभागाला जम्बो यादी दिली आहे.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले. मात्र, महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी जलसंपदा विभागाला जम्बो यादी दिली आहे. त्यामुळे पाणी परिस्थिती व पिकांना लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने कुकडीच्या आवर्तनात ५० टक्क्याने कपात करून आता फक्त फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम जळून जाणार आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना मृगजळ ठरणार आहे. कुकडीच्या आवर्तनावरून राजकीय नेत्यांनी मोठा गाजावाजा केला. अखेर ३ डिसेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले. ३० दिवसात साडेचार टीएमसी पाणी वापरून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन करण्यासाठी करमाळा, कर्जत तालुक्याला पाणी देण्यात आले. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी टंचाई शाखेची बैठक घेतली आणि नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे तलाव भरण्याचा निर्णय घेतला. प्रचलित तलावात पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास देण्यात आले. जलसंपदा विभागाने पारनेर तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्र, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यासाठी प्रत्येकी १५ हजार हेक्टर व करमाळा तालुक्यासाठी १२ हजार हेक्टर क्षेत्र गृहित धरून आवर्तनाचे नियोजन करुन यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र,गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पिकेही दुप्पट पाणी शोषण करु लागली. अशी परिस्थिती गृहीत धरलेल्या क्षेत्रास पाणी देणे अवघड झाले आहे. पिकांना की तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे, अशी द्विधा मनस्थिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झाली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून फळबागांना पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवून घेतले आहे. कुकडी पाटपाणी कृती समिती सदस्यांनी डी वाय ९ ते १४ या वितरीकांना ३ ऐवजी ७ दिवस पाणी देण्याची मागणी केली आहे. मात्र, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुुभाष कोळी यांनी कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही. यावरुन सुरू असलेले आवर्तन गुंडाळले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.