शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

हळगाव, आघी परिसराला चक्रिवादळाचा तडाखा : लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:49 IST

जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले.

हळगाव : जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वीज पडून तीन जनावरे दगावले. वादळामुळे शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. हळगाव व आघी या दोन गावांना मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या वादळामुळे सगळीकडे दाणादाण उडाली होती. पावसापेक्षा चक्रीवादळाची तीव्रता मोठी होती. वाादळामुळे हळगाव व आघी या दोन गावांमधील चारा छावण्यांमध्ये वीज कोसळून तीन जनावरे दगावली. छावण्यांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. छावण्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हाल होऊ नयेत याकरिता बहूतांश शेतकरी आपली जनावरे घरी घेऊन जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मंगळवारी रात्री काही शेतकर्यांनी आपली जनावरे पाऊस उघडल्यानंतर घरी घेऊन जाणे पसंद केले. चारा व पाण्याचा परिसरात ठणठणाट असल्यामुळे जीवाची पर्वा न करता पशुपालकांना नाईलाजाने जनावरांंसह छावण्यांमध्येच थांबण्याची वेळ आली आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पंचायत समितीचे गटविकासाधिकारी रूपचंद जगताप, कामगार तलाठी प्रफुल्ल साळवे, ग्रामसेवक विश्वनाथ खेंगरे, ग्रामसेवक सचिन गदादे, यांचा समावेश असलेले पथक बूधवारी सकाळी हळगाव गावात दाखल झाले होते.हळगाव येथील चारा छावणीला या पथकाने भेट दिली. या छावणीतील शेतकरी शिवाजी शहाजी ढवळे यांची एक गाय व एक बैल वीज कोसळून ठार झाले होते. घटनास्थळाची महसुल पथकाने पाहणी केली. यावेळी पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार शिवाजी ढवळे यांचे तब्बल 80 हजाराचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हळगाव गावातीलच नानासाहेब लक्ष्मण ढवळे यांच्या राहत्या घरालाही वादळाचा तडाखा बसला यात घरासह घरातील भांडे व संसार उपयोगी साहित्यांचे भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. एकनाथ आश्रू तांबे या शेतकर्याच्या घरावरील 14 पत्रे उडून गेले. वादळामुळे घराची भिंत पडली असून घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आघी गावालाही चक्रिवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसात सीना ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीस कोसळून हनुमंत भाऊ तेरकर या शेतकयार्ची 40 हजार रुपए किमतीची खिलारी गाय ठार झाली. तसेच आघी गावातील बोराटे वस्ती परिसरातही चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. या भागातील विजेचे अनेक खांब कोसळले आहेत. या वादळात मोहन नारायण बोराटे या शेतक-याच्या घरावरील 9 पत्रे उडून गेले तसेच सदाशिव सजेर्राव बोराटे यांच्या घरावरील 13 पत्रे उडून गेले. आघी गावातील नामदेव राजेंद्र गावडे या शेतकर्याच्या घरावरील 10 पत्रे उडून गेले. बाबासाहेब पोपट इंगळे यांच्या घरावरील 10 पत्रे उडून गेले. तसेच राजेंद्र मणिक पुढाईत यांच्या घरावर शेजारच्या घरावरील अँगल उडून पडल्याने दोन पत्र्यांचे नुकसान झाले तर द्वारकाबाई मणिक पुढाईत यांच्या घराची भिंत वादळामुळे पडली. ज्या शेतकर्यांच्या घरावरील सर्वच्या सर्व पत्रे उडून जाण्याची घटना घडली त्या परिसरात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यानंतर कामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी तातडीने पंचनामे पुर्ण करत जामखेड तहसिल कार्यालयाला अहवाल सादर केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड