शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बदलीसाठी गुरुजींकडून अपंग बहीण-भाऊ दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:18 IST

वंशाचा दिवा असावा, यासाठी आपल्याकडे मुलं दत्तक घेतले जाते. गुरुजींनी मात्र सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविण्याठी आपल्याच भावा- बहिणींना दत्तक घेतल्याचा प्रकार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत समोर आला आहे. बदलीसाठी अपंगांचे पालकत्व सध्या जिल्हा परिषदेतील चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमदनगर : वंशाचा दिवा असावा, यासाठी आपल्याकडे मुलं दत्तक घेतले जाते. गुरुजींनी मात्र सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविण्याठी आपल्याच भावा- बहिणींना दत्तक घेतल्याचा प्रकार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत समोर आला आहे. बदलीसाठी अपंगांचे पालकत्व सध्या जिल्हा परिषदेतील चर्चेचा विषय ठरला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बदलीस अपात्र शिक्षकांच्या सुनावणीला सुरुवात झाली. शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील २३४ शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने विविध कारणांमुळे अपात्र ठरविल्या आहेत. बदलीस अपात्र जिल्ह्यातील १४७ गुरुजींनी स्वत: त्यांचे म्हणणे मांडले. सुनावणीदरम्यान अपंगांचे पालकत्व स्वीकारलेल्या पाच शिक्षकांनी संवर्ग १ मधून बदल्या मिळविल्याचा विषय चर्चेसाठी आला. अपंग मुलांचे पालकत्व आणि तेही आपल्याच बहिणीचे दत्तक विधान यावेळी गुरुजींकडून सादर करण्यात आल्याने अधिकारीही अवाक् झाले. दोघा शिक्षकांनी आपल्या अपंग भावाचा संभाळ करत आहोत, त्यामुळे आम्हाला दूरच्या शाळेवर नियुक्ती न देण्याची विनंतीही यावेळी केल्याचे समजते. अपंग बहीण-भावाला दत्तक घेऊन शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविली.  बदलीप्रक्रियेत संवर्ग १ मध्ये गतिमंद, मंतिमंद, विकलांग मुलांचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांना सवलत मिळते. या सवलतीचा जिल्ह्यातील पाच शिक्षकांनी लाभ घेतला. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दत्तक विधान म्हणजे काय, ते कसे करावे लागते, कोणाकडून करावेत, ते ग्राह्य कसे धरायचे, यासह अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेतील काही अधिकारी कामाला लागले आहेत. अपंग मुलांचे पालकत्व स्वीकारणा-यांना बदलीत सवलत द्यावी किंवा नाही, याबाबतचा ठोस निर्णय घेण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. पती-पत्नी एकत्रिकरण या सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी काहींनी रस्त्यात ओढा असल्याने लांबून जावे लागत असल्याचे कारण दिले आहे. गुगल मॅपचे अंतर आणि प्रत्यक्षात दिलेले अंतर यात तफावत आढळून आल्याने दुचाकीवरून अंतर मोजण्यात आले. मात्र ते शिक्षकांना मान्य नाही़ त्या रस्त्याने बसच जात नाही, असे कारणही काहींनी दिले आहे.विस्थापित आक्रमककागदपत्रांच्या तपासणीतील गोंधळ आणि विस्थापितांना अपात्र शिक्षकांच्या जागी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी विस्थापित पुन्हा आक्रमक झाले आहेत. विस्थापितांच्या वतीने जिल्हा परिषदेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद