शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:32 IST

मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते

अहमदनगर : मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते. नगर मतदारसंघातील वांबोरी, खोसपुरी, शिराळ हा प्रदेशही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे.राहुरी तालुक्यातील वांबोरी हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. टरबूज विकणारा एक शेतकरी वांबोरीच्या चौकात भेटला. शेतीत पाणी राहिले नाही म्हणून चिंतेत होता. वांबोरी चारी झाली. मात्र, त्यातून वांबोरी बारमाही सिंचनाखाली आलेली नाही. पाथर्डी तालुक्यातील गावांची अशी तक्रार आहे की वांबोरीला या चारीचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र, वांबोरीचे शेतकरीही या चारीबाबत पूर्णत: समाधानी दिसत नाहीत.गप्पांच्या ओघात मतदानाचा विषय निघाला. हा शेतकरी विज्ञान शाखेतील पदवीधर होता. आंतरराष्टÑीय पातळीवर काय घडामोडी सुरू आहे हे सुद्धा तो बोलत होता. शेतकऱ्याला या सरकारच्या काळात काही मिळाले नाही, अशी त्याची नाराजी होती. मात्र, मोदींच्या इतर काही धोरणांचे तो स्वागतही करत होता. आपण कुणाच्या बाजूचे आहेत हे समोरच्याला कळूच नये याची आता अनेक मतदार खबरदारी घेतात. तेच या शेतकऱ्याच्या बोलण्यातही जाणवत होते.गावात फिरताना काच, कागद, पत्रा गोळा करणाºया काही महिला भेटल्या. आपणाला घरकूल, गॅस काहीच मिळाले नसल्याचे यातील काही महिला सांगत होत्या. काही महिलांनी मात्र गॅस मिळाल्याचे सांगितले. या महिलांपैकी काहीजणी मोदी सरकारच्या बाजूने तर काही विरोधात बोलत होत्या. एक गॅसची योजनाही लोकांचे सरकारबद्दलचे मत बनविण्यास अशी कारणीभूत ठरते. या योजना मतांसाठीच असतात की काय? असा प्रश्न त्यातून पडतो. भाजप-काँग्रेस या दोन्ही बाजूने घोषणा झाल्या व होतील. मात्र, या महिलांच्या पाठीवरील कचºयाची गोणी हटविण्यात काँग्रेसप्रमाणेच मोदी सरकारही अपयशी ठरल्याचे दिसते.वांबोरीची व्यापारी पेठही मोठी आहे. एक कापड दुकानदार भेटले. त्यांची इंग्रजीची जाण उत्तम होती. सोबत इंग्रजी वर्तमानपत्रही होते. सुरुवातीला मोदी यांच्या काही धोरणांचे त्यांनी कौतुक केले. पण, जेव्हा ग्रामीण भागावर विषय आला तेव्हा शेतकरी नाराज असल्याचे सांगितले. जेव्हा विषय वांबोरीवर आला तेव्हा त्यांनी स्थानिक प्रश्न मांडत सर्वच पक्षांबाबत नाराजी नोंदवली. आमच्या गावात साधे वरिष्ठ महाविद्यालय आजवर होऊ शकले नाही ही त्यांची प्रमुख खंत होती. माझी पिढी गेली, पण पुढील पिढ्यांसाठी तरी गावात शिक्षणाची सोय होणार की नाही? किती दिवस आम्ही नेत्यांचा नुसता जयजयकार करायचा? त्यांना हे प्रश्न विचारणार की नाही? अशी खदखद ते बोलून दाखवत होते.वांबोरी सोडून खोसपुरीकडे निघालो. खोसपुरीत विहिरींचे पाणी पूर्ण आटले आहे. गावाच्या चौकात उभे राहिलो तरी दुष्काळ जाणवतो. एका सलून दुकानात काही गावकरी बसले होते. एका शेतकºयाला बोलते केले. वर्षभराचा आपला आर्थिक प्रवास त्याने मांडला. त्याची पाच एकर शेती आहे. तो म्हणाला, यावर्षी सात-आठ पोते बाजरी झाली. हरभरा, ज्वारी पाण्याअभावी जळून गेली. सरकारने दोन हजार रुपये अनुदान दिले. त्यात काय होणार? त्यात मी काही पैसे टाकले व मुलांना दूध पिण्यासाठी शेळी घेतली आहे. मतदानाचा विषय काढला. तेव्हा सगळे लोक चिडीचूप झाले. ‘काहीच सांगता येणार नाही’ अशी सर्वांची एकमुखी प्रतिक्रिया होती.खोसपुरीतून शिराळला गेलो. येथील गावकरी सांगत होते. आमच्या गावात सात पाणी योजना झाल्या. पण, तरी प्यायला पाणी नाही. येथे जनावरांची चारा छावणी सुरु आहे. तेथे दुपारी सावलीला काही शेतकरी बसले होते. तेथेच आम्ही गप्पांचा फड रंगविला. यातील काही लोक जरा बिनधास्त दिसले. न घाबरता भाजप व राष्टÑवादी या दोन्ही उमेदवारांच्या कमीजास्त बाजू काय आहेत? याचे विश्लेषण मांडत होती. अर्थात ते कुणाला मत देतील हे मात्र त्या चर्चेतून समजू शकले नाही. या गप्पांमध्ये छबुराव मुळे या निवृत्त शिक्षकांनी जुन्या काळातील काही आठवणी सांगितल्या.पूर्वी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व होते. तेव्हाच्या प्रचारात एक गुणवत्ता व सकसपणा होता असे ते म्हणाले. शाहीर अमर शेख आमच्या भागात काँग्रेसच्या प्रचारासाठी कलापथक घेऊन यायचे. ‘बैलजोडीची खूण धर ध्यानी गं, मतदानाला चल माझ्या राणी गं’ हे अमर शेखांचे गाणे त्यांना आजही आठवते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर