शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

अनुदान रखडलं, डोनेशन आटलं; मुलांचा सांभाळ करायचा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:20 IST

अहमदनगर : बालकांची काळजी व संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतानाही त्याकडेच सरकारसह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. कोरोना काळात ...

अहमदनगर : बालकांची काळजी व संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतानाही त्याकडेच सरकारसह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. कोरोना काळात होणारे हे दुर्लक्ष बालगृह चालकांची कसोटी पाहणारे ठरत आहे. सरकारकडून मिळणारे अनुदानही वेळेत मिळत नाही. त्याचवेळी समाजातील दानशुरांकडून मिळणारी मदतही आटली आहे. निराधार बालकांचा कोरोनापासून बचाव करताना संस्थांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे बालगृहातील मुलांचा सांभाळ कसा करायचा, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात निराधार बालकांच्या ४१ संस्था आहेत. यातील १७ संस्थांमध्ये सध्या ४१५ बालके आहेत. संस्थेतील बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून बाह्य व्यक्तींना संस्थांमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच जे कर्मचारी बाहेर गावावरुन येऊन-जाऊन काम करत होते, त्यांनाही निवासी थांबण्याच्या किंवा संस्थेत न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बालकांची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी पौष्टिक आहार देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बालकांच्या स्वच्छतेवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे बालकांवरील खर्चात मोठी झालेली आहे. मात्र, सरकारकडून मिळणारे अनुदानही वेळेत मिळत नाही. तसेच समाजातून मिळत असलेली देणगीही पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे बालगृहांपुढे आर्थिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

...........

बालकांचा सांभाळ करणाऱ्या संस्था - ४१

निरीक्षण व बालगृह : २

निरीक्षणगृह : १

बालगृह : ३६

...........

संस्थेतील मुलांचा रोज सकाळी व्यायाम घ्यावा, आंघोळ झाल्यानंतर मुलांना नाष्टा, नंतर जेवण अशा वेळा ठरवून दिलेल्या असतात. कोरोना काळात प्रत्येक बालकाची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बालकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विशेष वैद्यकीय पथकाचीही स्थापना केली आहे.

- वैभव देशमुख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

.............

जिल्ह्यात ४१ संस्था असून, सध्या फक्त १७ संस्थांमध्येच बालके ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. एक पालक व निराधार बालकांनाच बालगृहात ठेवले जात आहे. कोरोनामुळे पालकांचे निधन झालेल्या बालकांनाही संस्थेत आदेशित करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बालकांचे पालक कोरोनाने मयत झाले असतील व ते निराधार झाले असतील तर अशा बालकांना बालकल्याण समितीकडे पोहोचविण्यात नागरिकांनी मदत करावी.

- हनिफ शेख, अध्यक्ष, बालकल्याण समिती

...............

संस्थांना पूर्वी दानशूर नागरिकांकडून वेगवेगळ्या स्वरुपात मदत मिळत असे. त्यामुळे सरकारकडून येणारे अनुदान जरी वेळेत आले नाही, तरी बालकांचा खर्च भागविण्यात अडथळे येत नव्हते. मात्र, कोरोना काळात संस्थांना होणारी मदतही आटली आहे. बालकांचा खर्च भागविण्यासाठी मोठी कसरत सुरु आहे. प्रसंगी कर्ज काढून बालकांचे खर्च भागवत आहोत.

- नितेश बनसोडे, संचालक, सावली बालगृह

.................

बालकांची रोजच आरोग्य तपासणी

संस्थांना ऑक्सिमीटर, तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करुन बालकांची त्याद्वारे रोज तपासणी करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. रोज घेतलेल्या नोंदी बाल संरक्षण अधिकाऱ्यांना पाठविण्यात येत आहेत.

............

बालगृहांपुढील समस्या

दानशुरांकडून येणाऱ्या देणग्या कोरोनामुळे थांबल्या.

पौष्टिक जेवण, आरोग्याच्या उपाययोजनांमुळे खर्च वाढला.

सरकारकडून अनुदान फक्त २० मुलांसाठीच, २०पेक्षा अधिक मुलांचा खर्च संस्थेनेच भागवायचा.

सरकारकडून मिळणारे अनुदानही वेळेत मिळत नाही. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत होते.

एका बालकासाठी १६५ स्क्वेअर फूट जागेची अट असल्यामुळे संस्थांपुढे जागेचा प्रश्न उभा ठाकला आहे.

बालगृहांमधील बालकांसाठी अनुदान येते, मात्र कर्मचाऱ्यांचा खर्च संस्थेनेच लोकसहभागातून भागवायचा आहे. त्यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी पगार याचा मेळ घालताना संस्थांच्या नाकीनऊ आले आहेत.