शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर शिक्षक मिळेनात, जिल्हा परिषदेत शाळा ओस पडू लागल्या...

By चंद्रकांत शेळके | Updated: July 5, 2023 16:14 IST

राज्यात २०१० पासून शिक्षकांची भरती झालेली नाही

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: राज्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही शिक्षण विभागात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. शिक्षकांचीच पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. हे विद्यार्थी खासगी शाळांची वाट धरू लागले आहेत. जिल्ह्यात ३४७ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने तेथे कोणी अध्यापन करायचे? असा प्रश्न उभा राहिला आहे.

राज्यात २०१० पासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे शालेय तसेच उच्च शिक्षण स्तरावर सुमारे ६५ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. अनेक वाडी-वस्तीवरील शाळांवर एकेकच शिक्षक आहे.

दरवर्षी होणारी निवृत्ती, अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती यामुळे जिल्ह्यात ८०९ पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची ३४७, तर उपाध्यापकांची ४१३ पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवतात. शाळेत हे पद रिक्त असेल तर थेट त्या वर्गावरच परिणाम होतो. विज्ञान, भाषा, समाज अभ्यास असे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.

पालकांची वाट खासगी शाळेकडे

अनेक शाळांत सहावी ते आठवीपर्यंतच्या विषयांना शिकवण्यासाठी पदवीधर शिक्षक नसल्याने पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेमधून काढून खासगी शाळेत टाकली आहेत. शासनाने लवकर या रिक्त जागा भरल्या नाहीत, तर अनेेक शाळा ओस पडण्याची भीती आहे.

७३ पदवीधरांना आणणार मूळ पदावर

जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्याने २०१६च्या शासन निर्णयानुसार बारावी विज्ञान अर्हतेवर काही शिक्षकांना पदवीधर म्हणून पदोन्नती दिली होती. दरम्यानच्या काळात या शिक्षकांना विज्ञानाची पदवी धारण करण्यास सांगितले होते. त्यातील १७७ जणांनी या कालावधीत पदवी घेतल्याने त्यांची पदोन्नती गृहीत धरण्यात आली. परंतु यातील ७३ शिक्षकांनी मुदतीत पदवी न घेतल्याने त्यांंना पुन्हा मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच (२३ जून) काढण्यात आला आहे.

आता पदवीधर भरणार सरळ सेवेतून

पूर्वी बारावी अर्हतेच्या शिक्षकांनी पदवी घेतली तर त्यांना पदवीधर म्हणून पदोन्नती दिली जात होती. परंतु शासनाने आता पदवीधरच्या रिक्त जागा पदोन्नतीने न भरता थेट सरळ सेेवेतून भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आता पदवीसह टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे.

टॅग्स :Schoolशाळा