शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द, तिजोरी खुली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:51 IST

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

शिर्डी : ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी येथील सरपंच परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचे मंथन एकत्रितरित्या होत आहे. ४१ वी सरपंच परिषद शिर्डीला होत आहे हे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात गावात मूलभूत गरजा देता आल्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाचे नवे मॉडेल समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे 30 हजार किमीचे रस्ते पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रातल्या सरपंचांनी दोन अडीच हजार गावे आदर्श केली. म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतला. सुशिक्षित सरपंच नव्या कल्पना घेऊन पुढे येऊ लागले. महिला पुढे येत आहेत. गावातील मुलांना पुढे नेण्याचे काम महिला सरपंच करीत आहेत. सरपंचाचे तीन पटींनी मानधन वाढविले. हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. सदस्यांचा लवकरच मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय घेणार आहे. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करू. शेतीच्या माध्यमातून प्रगती, ठिबकसाठी 80 टक्के अनुदानाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहोत. 5 हजार मेगावॅट वीज सोलर फिडरद्वारे देऊन दिवसा शेतक-यांना 12 तास वीज देणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस