शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी गोड बातमी..यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के जादा पाऊस; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:58 IST

यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली.

भाऊसाहेब येवले /  राहुरी : यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली. भारतात पावसाची सरासरी अकराशे ते बाराशे मिलिमीटर आहे. महाराष्ट्रात पावसाची सरासरी ७०० ते ८०० मिलिमीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाचशे ते साडेपाचशे मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार येथे अडकून पडला आहे. तो पुढे सरकल्यानंतर १ जूनला केरळला येत असतो. यंदा मात्र ५ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत, असे रवींद्र आंधळे यांनी सांगितले.राहुरी येथे सोमवारी ४१ अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात ४२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान सध्या ४५ अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तापमानात होणारी वाढ लक्षात घेता पिकांना पाण्याची गरजही वाढू लागली आहे. पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे, असे त्यांनी सूचविले आहे.

 सध्या उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मी महिन्यात कपाशीची लागवड करू नये. २५ मे नंतर बीटी कॉटनची लागवड करण्याची शिफारस आहे. मात्र सध्याचे तापमान लक्षात घेता पावसाचा शिरकाव झाल्यानंतर कपाशीची लागवड करावी. जूनअखेर कपाशीची लागवड पूर्ण करावी. यंदा सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे. -रवींद्र आंधळे, सहयोगी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसRahuriराहुरी