शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

शेतक-यांसाठी गोड बातमी..यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के जादा पाऊस; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:58 IST

यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली.

भाऊसाहेब येवले /  राहुरी : यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली. भारतात पावसाची सरासरी अकराशे ते बाराशे मिलिमीटर आहे. महाराष्ट्रात पावसाची सरासरी ७०० ते ८०० मिलिमीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाचशे ते साडेपाचशे मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार येथे अडकून पडला आहे. तो पुढे सरकल्यानंतर १ जूनला केरळला येत असतो. यंदा मात्र ५ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत, असे रवींद्र आंधळे यांनी सांगितले.राहुरी येथे सोमवारी ४१ अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात ४२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान सध्या ४५ अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तापमानात होणारी वाढ लक्षात घेता पिकांना पाण्याची गरजही वाढू लागली आहे. पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे, असे त्यांनी सूचविले आहे.

 सध्या उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मी महिन्यात कपाशीची लागवड करू नये. २५ मे नंतर बीटी कॉटनची लागवड करण्याची शिफारस आहे. मात्र सध्याचे तापमान लक्षात घेता पावसाचा शिरकाव झाल्यानंतर कपाशीची लागवड करावी. जूनअखेर कपाशीची लागवड पूर्ण करावी. यंदा सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे. -रवींद्र आंधळे, सहयोगी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसRahuriराहुरी