शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेवगाव तालुक्यातील शेतकरी आंदोलनावरुन राजकीय पटलावर ‘गोळीबार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:26 IST

शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगरमधील प्रकरणांवरुन स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी केली आहे.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगरमधील प्रकरणांवरुन स्वतंत्र गृहमंत्र्यांची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निशाणा केला़ मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तो फेटाळत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. आता शिवसेनेकडून शेतकरी गोळीबारावरुन भाजपला घेरण्याची तयारी सुरु आहे.गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जखमींची भेट घेत शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारवर टीका केली़ शेतक-यांवरील गोळीबारावरुन सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही जखमींची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. विखे म्हणाले, एफआरपीनुसार ऊस दर न देणा-या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी. त्यांचे होणी हात धरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडेच ठेवली आहेत. गृहखाते प्रभारी आहे़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवरच वचक नाही. सांगली व नगरमधील घटना पाहता पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांवर गोळीबार करणा-या पोलिसांना तत्काळ निलंबीत करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आज (शुक्रवारी, दि़ १६) जखमी शेतक-यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवरुन या शेतकरी गोळीबाराची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यामुळे शिवसेनाही या मुद्यावरुन सरकारला घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील