शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोन्यासारखी ढोबळी मिरची मातीमोल; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:23 IST

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.

पिंपळगाव माळवी : जगासह देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने शेतक-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतक-यांवर आर्थिक कु-हाड कोसळली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.सागर गुंड यांनी आपल्या शेतीमध्ये बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस बांधले असून दहा गुंठ्यांमध्ये तीन हजार रंगीत ढोबळी मिरची रोपांची लागवड केली होती. मशागत, औषध फवारणी यावर दीड लाख रुपये खर्च केला होता. या मिरची पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा गुंड यांना होती. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बाजारपेठा ठप्प झाल्यामुळे या मिरचीला मागणी नाही. त्यामुळे गुंड यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. गुंड यांनी रोजाने शेत मजूर लावून मिरची तोडून बांधावर फेकून दिली आहे. मागणी नसल्यामुळे  त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

डिसेंबर महिन्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली होती. कुटुंबासह रात्रंदिवस कष्ट घेतले. समाधानकारक पीक आले. परंतु मागणीअभावी चार टन माल फेकून द्यावा लागला. अजून तीन महिने उत्पादन होईल, परंंतु लॉकडाऊन असाच राहिला तर बरबाद होण्याची वेळ निश्चितच येईल, असे शेतकरी सागर गुंड यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी