शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

सोन्यासारखी ढोबळी मिरची मातीमोल; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 14:23 IST

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.

पिंपळगाव माळवी : जगासह देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने शेतक-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतक-यांवर आर्थिक कु-हाड कोसळली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.सागर गुंड यांनी आपल्या शेतीमध्ये बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस बांधले असून दहा गुंठ्यांमध्ये तीन हजार रंगीत ढोबळी मिरची रोपांची लागवड केली होती. मशागत, औषध फवारणी यावर दीड लाख रुपये खर्च केला होता. या मिरची पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा गुंड यांना होती. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बाजारपेठा ठप्प झाल्यामुळे या मिरचीला मागणी नाही. त्यामुळे गुंड यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. गुंड यांनी रोजाने शेत मजूर लावून मिरची तोडून बांधावर फेकून दिली आहे. मागणी नसल्यामुळे  त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

डिसेंबर महिन्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली होती. कुटुंबासह रात्रंदिवस कष्ट घेतले. समाधानकारक पीक आले. परंतु मागणीअभावी चार टन माल फेकून द्यावा लागला. अजून तीन महिने उत्पादन होईल, परंंतु लॉकडाऊन असाच राहिला तर बरबाद होण्याची वेळ निश्चितच येईल, असे शेतकरी सागर गुंड यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी