शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 13:03 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

रोहित टेके  /  कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

 गोधेगावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. या गावात २०१९ या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास १०० तरुणांचे विवाह झाले आहेत. नवीन विवाह झाला की घरात पाळणा हलण्याचे वेध कुटुंबीयांसह नातेवाईकांना लागतात. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे लोण थेट ग्रामीण भागातही पसरले आहे.

 रविवारी ममदापूर (ता़राहाता) येथील तरुण कोरोनाबाधित आढळला. या तरुणाचा संपर्क गोधेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी तातडीने सोमवारी (दि.१ जून) कोरोनाच्या उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्सिंगने विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत विविध निर्णय घेण्यात आले. 

गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना सभेत आवाहन करण्यात आले. २०२० व २०२१ या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये. कारण यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता नवविवाहितांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाचा प्रभाव दूर होईपर्यंत अपत्य जन्मास न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटकाळात गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाला नाही तर मातेच्या व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मागील आठवड्यात नगर येथील कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुस-या दिवशीच तिचा मृत्यू झाला. अशी वेळ आपल्या गावातील कुणावरच येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.                                                                                     -अशोक भोकरे, सरपंच, गोधेगाव, ता. कोपरगाव.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगाव