शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 13:03 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

रोहित टेके  /  कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

 गोधेगावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. या गावात २०१९ या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास १०० तरुणांचे विवाह झाले आहेत. नवीन विवाह झाला की घरात पाळणा हलण्याचे वेध कुटुंबीयांसह नातेवाईकांना लागतात. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे लोण थेट ग्रामीण भागातही पसरले आहे.

 रविवारी ममदापूर (ता़राहाता) येथील तरुण कोरोनाबाधित आढळला. या तरुणाचा संपर्क गोधेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी तातडीने सोमवारी (दि.१ जून) कोरोनाच्या उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्सिंगने विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत विविध निर्णय घेण्यात आले. 

गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना सभेत आवाहन करण्यात आले. २०२० व २०२१ या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये. कारण यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता नवविवाहितांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाचा प्रभाव दूर होईपर्यंत अपत्य जन्मास न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटकाळात गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाला नाही तर मातेच्या व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मागील आठवड्यात नगर येथील कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुस-या दिवशीच तिचा मृत्यू झाला. अशी वेळ आपल्या गावातील कुणावरच येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.                                                                                     -अशोक भोकरे, सरपंच, गोधेगाव, ता. कोपरगाव.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगाव