शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:06 IST

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोणी (अहमदनगर) : गोदावरी खोरे राज्यातील सगळ्यात मोठे खोरे आहे. या खो-याचे आपण नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व बाबी आम्ही या जलआराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. हा जल आराखडा तयार करताना त्यांच्या सर्व सुचनांची व सगळ्या बाबींची काळजी घेऊन तो आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोणी (ता. राहाता) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, २९ उपखो-यांचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या गोदावरी खो-याचा संपूर्ण जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. एवढा मोठा जलआराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणून या भागातील जलसंकट दूर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. पाण्याच्या तुटीमुळे उत्तर महाराष्ट्र विरुध्द मराठवाडा असा जलसंघर्ष पहायला मिळाला. दोन दोन जिह्यातील जलसंघर्ष पहायला मिळाला. हे वाईट चित्र व संघर्ष बदलण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे जे नियोजन होते, ते आपण प्रत्यक्षात आणू शकलो, तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. त्यांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे नियोजन पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील व प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकरी जलनियोजनातून समृध्द होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील