शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:06 IST

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोणी (अहमदनगर) : गोदावरी खोरे राज्यातील सगळ्यात मोठे खोरे आहे. या खो-याचे आपण नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व बाबी आम्ही या जलआराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. हा जल आराखडा तयार करताना त्यांच्या सर्व सुचनांची व सगळ्या बाबींची काळजी घेऊन तो आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोणी (ता. राहाता) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, २९ उपखो-यांचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या गोदावरी खो-याचा संपूर्ण जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. एवढा मोठा जलआराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणून या भागातील जलसंकट दूर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. पाण्याच्या तुटीमुळे उत्तर महाराष्ट्र विरुध्द मराठवाडा असा जलसंघर्ष पहायला मिळाला. दोन दोन जिह्यातील जलसंघर्ष पहायला मिळाला. हे वाईट चित्र व संघर्ष बदलण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे जे नियोजन होते, ते आपण प्रत्यक्षात आणू शकलो, तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. त्यांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे नियोजन पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील व प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकरी जलनियोजनातून समृध्द होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील