शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:06 IST

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोणी (अहमदनगर) : गोदावरी खोरे राज्यातील सगळ्यात मोठे खोरे आहे. या खो-याचे आपण नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व बाबी आम्ही या जलआराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. हा जल आराखडा तयार करताना त्यांच्या सर्व सुचनांची व सगळ्या बाबींची काळजी घेऊन तो आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोणी (ता. राहाता) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, २९ उपखो-यांचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या गोदावरी खो-याचा संपूर्ण जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. एवढा मोठा जलआराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणून या भागातील जलसंकट दूर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. पाण्याच्या तुटीमुळे उत्तर महाराष्ट्र विरुध्द मराठवाडा असा जलसंघर्ष पहायला मिळाला. दोन दोन जिह्यातील जलसंघर्ष पहायला मिळाला. हे वाईट चित्र व संघर्ष बदलण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे जे नियोजन होते, ते आपण प्रत्यक्षात आणू शकलो, तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. त्यांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे नियोजन पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील व प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकरी जलनियोजनातून समृध्द होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील