शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पर्यटकांना खुनावतोय भातोडीचा वैभवशाली इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:51 IST

नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ योगेश गुंड/  केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर वसलेल्या भातोडीच्या मेहेकरी नदीच्या तीरावर सुमारे ७०० वर्षे पूर्वीचे दगडी शिल्पातील श्री नृसिंहाचे जाज्वल मंदिर आहे. सन १४४० मध्ये कान्हो नरसोजी नावाच्या वीर प्रधानाने हे मंदिर बांधले असल्याचा काही ठिकाणी इतिहासप्रेमी दाखला देतात. मंदिरासमोर दगडी कोरीव कामातील दीपमाळ आहे. नदीवर भव्य घाटही आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व इतर संतांची मंदिरे विराजमान आहेत. तसेच नागनाथ श्री काशी विश्वेश्वर व श्री सिद्धेश्वराची मंदिरे आहेत. २०१६-२०१७ मध्ये या मंदिराचा ड वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला होता. नंतर पुढील वर्षी  मंदिर क वर्गात आले. त्यामुळे वॉल कंपाउंड तसेच पेव्हर ब्लॉकची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षात सुशोभीकरणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत.१६२४ मध्ये येथे झालेल्या इतिहास प्रसिद्ध लढाईत शहाजीराजे भोसले यांनी कामगिरी बजावून मोठा विजय मिळविला होता. या दरम्यान  शरीफजी राजे भोसले यांना मोघलांच्या विरोधात लढाई करताना वीरमरण आले होते. त्यांचे समाधीस्थळ भातोडी गावात आहे. ही लढाई इतिहासातील मोठी लढाई समजली जाते. या लढाईत अतिशय चतुराईने शरीफजी राजे भोसले यांनी तलाव फोडून हजारो मोघलांना जमिनीत गाडले होते. या सह ७५० हेक्टर चा ऐतिहासिक तलाव निजामशाही काळात बांधला गेला आहे, तोही पाहण्यासारखा आहे.  गावापासून हाकेच्या अंतरावर बीड जिल्ह्याच्या सीमेवर कलावनतीचा महाल आहे. त्याची पडझड झाली असून त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सन १५८८ मध्ये सलाबत खानने बांधलेला हत्ती बारव प्रसिद्ध आहे. असे हे पुरातन आणि ऐतिहासिक गाव पर्यटकांना खुणावत आहे. शासनानेही येथील पर्यटनस्थळांचा गांभीर्याने विकासकामांत समावेश करणे गरजेचे आहे. मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट करण्यात आला आहे.  लवकरच मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. शासनाने तीर्थक्षेत्राचा निधी लवकर द्यावा, असे भातोडीचे सरपंच संगीता नेटके यांनी सांगितले. 

    

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर