शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

पर्यटकांना खुनावतोय भातोडीचा वैभवशाली इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:51 IST

नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ योगेश गुंड/  केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी गाव  जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर वसलेल्या भातोडीच्या मेहेकरी नदीच्या तीरावर सुमारे ७०० वर्षे पूर्वीचे दगडी शिल्पातील श्री नृसिंहाचे जाज्वल मंदिर आहे. सन १४४० मध्ये कान्हो नरसोजी नावाच्या वीर प्रधानाने हे मंदिर बांधले असल्याचा काही ठिकाणी इतिहासप्रेमी दाखला देतात. मंदिरासमोर दगडी कोरीव कामातील दीपमाळ आहे. नदीवर भव्य घाटही आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व इतर संतांची मंदिरे विराजमान आहेत. तसेच नागनाथ श्री काशी विश्वेश्वर व श्री सिद्धेश्वराची मंदिरे आहेत. २०१६-२०१७ मध्ये या मंदिराचा ड वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला होता. नंतर पुढील वर्षी  मंदिर क वर्गात आले. त्यामुळे वॉल कंपाउंड तसेच पेव्हर ब्लॉकची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षात सुशोभीकरणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत.१६२४ मध्ये येथे झालेल्या इतिहास प्रसिद्ध लढाईत शहाजीराजे भोसले यांनी कामगिरी बजावून मोठा विजय मिळविला होता. या दरम्यान  शरीफजी राजे भोसले यांना मोघलांच्या विरोधात लढाई करताना वीरमरण आले होते. त्यांचे समाधीस्थळ भातोडी गावात आहे. ही लढाई इतिहासातील मोठी लढाई समजली जाते. या लढाईत अतिशय चतुराईने शरीफजी राजे भोसले यांनी तलाव फोडून हजारो मोघलांना जमिनीत गाडले होते. या सह ७५० हेक्टर चा ऐतिहासिक तलाव निजामशाही काळात बांधला गेला आहे, तोही पाहण्यासारखा आहे.  गावापासून हाकेच्या अंतरावर बीड जिल्ह्याच्या सीमेवर कलावनतीचा महाल आहे. त्याची पडझड झाली असून त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सन १५८८ मध्ये सलाबत खानने बांधलेला हत्ती बारव प्रसिद्ध आहे. असे हे पुरातन आणि ऐतिहासिक गाव पर्यटकांना खुणावत आहे. शासनानेही येथील पर्यटनस्थळांचा गांभीर्याने विकासकामांत समावेश करणे गरजेचे आहे. मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट करण्यात आला आहे.  लवकरच मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. शासनाने तीर्थक्षेत्राचा निधी लवकर द्यावा, असे भातोडीचे सरपंच संगीता नेटके यांनी सांगितले. 

    

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर