शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

राज्यातील २९ हजार कुटुंबांना ‘न्याय’चा अनुभव देणार-सत्यजीत तांबे; प्रदेश युवक कॉँग्रेसचा प्रतिकात्मक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:26 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली. 

संगमनेर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (२१ मे) महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने ‘अनुभव न्याय मिळाल्याचा’ या न्याय योजनेसारखी योजना केंद्र सरकारने सुरू करावी, अशी मागणी करणारा प्रतिकात्मक कार्यक्रम राबविणार आहे. राज्यातील २९ हजार कुटुंबांना न्याय योजनेचा अनुभव देणार आहे, अशी माहिती युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.  कॉँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत न्याय योजनेचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजार पेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना कॉँग्रेस सरकारकडून दरमहा सहा हजार रूपये म्हणजेच दोनशे रूपये प्रतिदिन थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतील. अशी ही योजना होती. कुटुंबातील महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. जेणेकरून या पैशाचा दुरूउपयोग होणार नाही. अशी तरतूद या योजनेमध्ये होती. मात्र, केंद्रामध्ये कॉँग्रेसचे सरकार न आल्यामुळे न्याय योजनेची अंमलबजावणी होवू शकली नाही.     सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र शासनाकडे न्याय सारखी योजना सुरू करण्याची मागणी करीत आहेत. गरजू कुटुंबियांच्या बॅँक खात्यात महिना सहा हजार रूपये जमा करावेत. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पुढील सहा महिन्यांसाठी अशीच एखादी योजना सुरू करावी. गरजूंना न्याय देण्याचे काम करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक  कॉँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे, असेही तांबे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे