शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गवार, शेवगा पोहोचला शंभरी पार; भेंडी, कारल्यानेही खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:52 IST

कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.

अहमदनगर : कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मंडई, बाजारात काही मोजक्याच भाजीपाल्याची आवक वाढली. यामध्ये टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची आदींचा समावेश आहे. हा भाजीपाला काहीसा रास्त भावात मिळतोय. मात्र गवार, शेवग्याच्या शेंगांची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे या दोन्ही भाज्यांसाठी प्रतिकिलोला १०० ते १२० रूपये मोजावे लागत आहेत. त्यातच बटाटाही गेल्या महिनाभरापासून ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. याशिवाय भेंडी, कारले, दोडका, वटाणा, आदींनीही भाव खाल्ला आहे. कांद्याची आवक वाढली असली तरी त्याच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. कांदाही ५० ते ६० रूपये किलोच्या दराने खरेदी करावा लागत आहे. भाजीपाल्याचा दर असे..(रूपये प्रतिकिलो)शेवगा, गवार- १००-१२०, आले, भेंडी, दोडका- ८०-१००, बिन्स, कारले, वटाणा- ५०-६०, ढोबळी मिरची, वांगी, फ्लावर, कोबी, डिंगरी-४०-५०,  बटाटे, मिरची- ३०-४०, टोमॅटो, गाजर- २०-३०. मेथी, पालक, कोथिंबीर जुडी-१० रूपये.

गेल्या काही दिवसांपासून वारंवार बदलणा-या हवामानाचा भाजीपाल्याच्या पिकांवर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेवगा, गवारीला बसला आहे. शेवग्याला पुरेसी फुलेच न लागल्याने त्याचे उत्पादन घटले तर गवारीवरही रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे बाजारात या दोन्ही पिकांची आवक अत्यंत कमी आहे, असे श्रीगोंदा येथील शेतकरी संदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरvegetableभाज्याBaazaarबाजार