शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 06:16 IST

माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.

शिर्डी / अहमदनगर : माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला.पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ रविवारी शिर्डीत येऊन उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुंबईतील दसरा मेळाव्यात मोदींवर टीका टाळणाऱ्या उद्धव यांच्या आजच्या भाषणात मात्र मोदी हेच टीकेचे लक्ष्य होते. ‘कसं काय पाहुणं बरं हाय का’ हे गाणे म्हणत त्यांनी मोदींच्या भाषणाची नक्कलही केली.ते म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी काही लोक साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. २०१९ मध्ये पुन्हा आम्हालाच सत्ता द्या, असे साकडेही त्यांनी साईबाबांना घातले, पण पाच वर्षे सत्ता देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल साईबाबांनी त्यांना केला असेल. खोटे बोलण्यात ते पटाईत आहेत. आता २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देणार, असे सांगून शिर्डीत चावी मारून गेले,’ असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला.सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल करणाºयांनाही उद्धव यांनी जोरदार उत्तर दिले. ‘आम्ही सत्तेतून कधीही बाहेर पडू शकतो, पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घेता येत असेल तर का बाहेर पडू? शेतकºयांचे प्रश्न, दुधाला भाव, पाणी देत असाल, तर पाचशे वर्षे सत्ता देऊ, पण तुम्ही केवळ खोटे बोलून सत्ता मिळविता़, अन्याय, अत्याचारावर कुणी बोलले तर त्याला देशद्रोही, विकासाचे विरोधक ठरविता. तुम्ही तर नवे मोगल निघालात’, असा हल्ला ठाकरे यांनी चढविला.सभास्थानी श्रीरामचे मोठे कटआउट लावण्यात आले होते. आगामी काळात राममंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातभाजपाची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून आला. राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम ही सगळी तुमची जुमलेबाजी आहे का, असा सवाल करत ‘मंदिर नही बनायेंगे’ असे एकदा सांगून टाका़ मग आम्ही काय करायचे ते करतो़, असे आव्हान उद्धव यांनी दिले.>शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळाराज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, परंतु लाखो शेतकºयांना अद्याप एक छदामही मिळालेला नाही. मग हे पैसे गेले कुठे? असा सवाल करत कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे यांनी अहमदनगर येथील सभेत केला. आजचं नगर म्हटले की, विखे, कर्डिले अन् छिंदम समोर येतात. ज्या पक्षाचा नगरसेवक छिंदम आहे, तो पक्ष कसा असेल, याचा विचार करा. निवडून दिलेल्या खासदाराला नगर ओळखत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांनाही नगरकर जनता ओळखणार नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे