शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

बाजार समित्यात ई-नाम योजनेचा फज्जा; पारंपरिक बोली पद्धतीनेच होतात लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:43 IST

श्रीरामपूर : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांपूर्वी राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना २०१६ पासून सुरू केली होती. पारंपरिक पद्धतीच्या लिलावाऐवजी आॅनलाईन लिलावाद्वारे शेतमालाच्या खरेदी विक्रीचे यात उद्दिष्ट होते.  शेतक-यांना कुठेही मालाची विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळून वाढीव दर मिळेल, असे सांंगितले गेले. मात्र नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा आढावा घेतला असता ही योजना कुठेही कार्यान्वित नसल्याचे समोर आले.

शिवाजी पवार । 

बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाईन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील नगर, नेवासा,   राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर या बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या. सरकारने त्यासाठी प्रत्येक समितीला ३० लाख रुपये दिले. त्यातून संगणक, प्रिंटर, राऊटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली.

काय आहे ई-नामडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल २०१६ मध्ये योजनेस सुरवात झाली. यानुसार शेतक-यांना ई-नाम पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर बाजार समितीत शेतमाल आणल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. त्याचा अहवाल शेतक-याला मिळतो.

शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाईल अ‍ॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतक-यांना ही प्रक्रिया आॅनलाईन दिसते. शेतकरी मिळणा-या दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते, अशी प्रक्रिया असणारी ही ई-नाम योजना आहे.

योजनेची वैैशिष्ट्येया लिलाव प्रक्रियेत आडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात आडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतक-यांच्या खात्यावर आॅनलाईन पैैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.

नगर जिल्ह्यातील स्थितीनगर : काही प्रमाणात भुसाराची  ई-नामद्वारे खरेदी सुरू झाली आहे. मात्र आडत्यांवर सक्ती करताच ते व्यवहार बंद पाडतात. आडते व्यवहार करायला तयार नाहीत.

श्रीरामपूर : अद्यापही योजना कार्यान्वित झालेली नाही. 

संगमनेर : आपले सर्व व्यवहार केंद्र सरकारला माहिती होतील या भितीने आडते या प्रणालीतून      खरेदी करत नाहीत. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे दिवसभरात निम्म्या मालाची सुद्धा खरेदी होणार नाही.

नेवासे : कांद्यामध्ये अनेक प्रकारचे वक्कल (मालाचा दर्जा) असतात. त्यामुळे आॅनलाईन खरेदी विक्री शक्य नाही. 

राहुरी :  ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. दबाव टाकून आडते राजी होत नाहीत. 

लिलाव खरेदीला तांत्रिक अडचण नाही. आडते तयार होत नाहीत हे खरे आहे. नगर जिल्ह्यासाठी आम्ही नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ते ई नाम प्रकियेवर लक्ष ठेवतात.-महेंद्र लोखंडे, सहायक सरव्यवस्थापक, महाराष्ट्र प्रदेश पणन मंडळ.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड