शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अचूक मतदारयादी निवडणूक संचलनाचा पाया : अरूण आनंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:38 IST

लोकशाहीच्या संवर्धनासाठी नि:ष्पक्षपाती निवडणूक संचलन अत्यंत महत्त्वाचे असते. निवडणूक संचलनाचा पाया हा अचूक व निर्दोष मतदारयादी असतो.

अहमदनगर : लोकशाहीच्या संवर्धनासाठी नि:ष्पक्षपाती निवडणूक संचलन अत्यंत महत्त्वाचे असते. निवडणूक संचलनाचा पाया हा अचूक व निर्दोष मतदारयादी असतो. यादृष्टीनेच गेल्या वर्षभर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमांमध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनाने अचूक मतदारयादी तयार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.आनंदकर म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून सन २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने राज्यात मोठा आहे. जिल्ह्यात १४ तालुके, २ लोकसभा व १२ विधानसभा मतदारसंघ असून जिल्ह्यात एकूण ३७२२ मतदान केंद्राद्वारे निवडणूक व मतदान यादी व्यवस्थापन प्रक्रिया सतत राबविण्यात येते. मागील वर्षभरात निवडणूक शाखेने मतदारयादीसंदर्भात अनेक उपक्रम राबवले. ‘कोणताही मतदार वंचित राहू नये’ या तत्त्वानुसार आणि ‘मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज’ या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्यात निवडणूक विभागाची वाटचाल सुरू आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना करून त्याकरिता टोल फ्री क्रमांक ‘१९५०’ सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व व्हीव्ह पॅट मशीन वापराबाबत मतदारांमध्ये जनजागृती मोहीम यशस्वीपणे सुरू आहे.जिल्ह्यात दर हजार पुरूष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांचे प्रमाण २०१५मध्ये केवळ ९०५ होते. जिल्हा निवडणूक शाखेने यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे हे प्रमाण २०१८मध्ये ९०७ व २०१९मध्ये ९१५ झाले आहे. मतदारयादीमध्ये छायाचित्र असल्याचे प्रमाण ९९.८८ टक्के आहे, तर जिल्ह्यात ९९.९० टक्के एवढ्या मतदारांना छायाचित्र निवडणूक ओळखपत्र (इपीक) उपलब्ध करून देण्यात जिल्हा निवडणूक शाखेस यश मिळाले आहे. समाजातील दिव्यांग व्यक्ती, एड्सबाधीत, तसेच तृतीयपंथी व्यक्ती यांची मतदार म्हणून १०० टक्के नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक विशेष प्रयत्न गेल्या वर्षभरात हाती घेण्यात आले आहेत.राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्वनीकुमार यांचे मार्गदर्शन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पाठबळ यामुळे आपला जिल्हा निवडणूक व मतदारयादीच्या व्यवस्थापन कामात राज्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याचीच दखल घेऊन भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून निवड केली. त्यानिमित्ताने विविध राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. निवडणूक विभागाच्या या कामकाजात सर्व अधिकारी, कर्मचारी, बीएलओ, प्रसिद्धीमाध्यमे, विविध सामाजिक संघटना आदींचे सहकार्य लाभले. आधी मतदार नोंदणी करून व नंतर प्रत्यक्ष मतदान करून प्रत्येकाने लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही शेवटी आनंदकर यांनी केले.नागरिकांचे सहकार्य अपेक्षितमतदारयादीचे अद्ययावतीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून, याबाबत नागरिकांनी कायम दक्ष व सजग राहणे आवश्यक आहे. मतदारयादीत आपले नाव योग्यरित्या आहे का? मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे त्या त्या वेळी वगळली जात आहेत का? वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करणे या सर्व प्रक्रियेत मतदार व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी आशा आनंदकर यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय