शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीने मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:14 IST

फुलशेती ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करु शकते. पण यासाठी सेंद्रिय पध्दतीची शेती करणे गरजेचे आहे. असे केले तर कमी खर्चात जादा पैसे मिळू शकतात.

यमन पुलाटेफुलशेती ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करु शकते. पण यासाठी सेंद्रिय पध्दतीची शेती करणे गरजेचे आहे. असे केले तर कमी खर्चात जादा पैसे मिळू शकतात. गेल्या २० वर्षापासून दुर्गापूर (ता. राहाता) येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे हे फूल शेती करीत असून ती त्यांना फायदेशीर ठरत आहे.दुर्गापूर (ता.राहाता) येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील वीस वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न त्यांना आले. पण बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत गटांची स्थापना केल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले असे लक्ष्मण पुलाटे यांनी सांगितले. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दंवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पिक संरक्षण, बाजारपेठ याची माहिती दिल्याने फूल शेतीला चांगले दिवस आले. आज या शेतीच्या माध्यमातून फूल शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे.झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करुन चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करुन लागवड केली जाते. प्रत्येकवेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करुन ८० टक्के सेंद्रिय खते तर १० टक्के रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून-पालटून ठिंबक आणि फवारणीतून वापर करतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतो. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन येलो,गोल्ड स्पॉट, अप्सरा येलो या वाणांचा वापर केला जातो.ऊस पिकांत देखील झेंडूची फुलशेती फायदेशीर असून मागील दोन वर्षापासून हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरत आहे. बाजारपेठ आपल्या हातात नाही, पण गुणवत्ता, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविणे हे आपण केले तर पिक फायदेशीर ठरते.झेंडू पिकांसाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि यापासून सरासरी ८-१० टन उत्पादन मिळून खर्च वजा जाता ७० ते ७५ हजाराचा नफा होतो, असे लक्ष्मण पुलाटे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीrahaataराहाता