शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:57 IST

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सुलेमान रसूल शेख हे सोमवारी रात्री पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधून बालमटाकळी येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास लोखंडी तारेची जाळी उचकाटून लांडग्यानी पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करत बांधून ठेवलेल्या लहान, मोठ्या अशा पाच शेळ्या ठार केल्या. गावातून शेतामध्ये गेल्यानंतर ही घटना त्यांच्या नजरेस पडली. सदरील घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.आर.जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डि.एम.गटकळ तसेच वनविभागाचे वनपाल पी.बी. वेताळ, वनरक्षक एस. आर. बुधवंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत शेळ्यांची उत्तरीय तपासणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. या शेळ्यांची शेख यांना भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरी