शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच पंचरंगी लढत

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून

संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून १६ वी निवडणूक पंचरंगी होत असल्याने राजकीय इतिहासात महत्वपूर्ण ठरणार आहे. संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहीला. १९३७ साली कम्युनिस्ट पक्षाकडून के.बी. दादा देशमुख हे निवडणूक जिंकून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार झाले. त्यांनी ल.मा. पाटील, काकासाहेब गरूड यांच्याशी तिरंगी लढत दिली. त्यानंतर १९४६ साली कॉ. दत्ता देशमुख कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनाही तिरंगी लढत द्यावी लागली. परंतु स्वातंत्र्य चळवळींमुळे कॉ. देशमुख यांना तुरूंगवास झाला. ते तुरूंगात असताना १० महिने बाजीराव कोते आमदार होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘असेंब्ली इलेक्शन’ ऐवजी ‘विधानसभा निवडणुका’ हा शब्द प्रचलित झाला. १९५२ सालच्या तिरंगी निवडणुकीत कॉ. देशमुख यांनी कामगार किसान पक्षाचे लोकप्रतिनिधीत्व करून बी.जे. खताळ(काँग्रेस) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९५७ ची दुरंगी निवडणूक कॉ. देशमुख आणि सरदार थोरात(काँग्रेस) यांच्यात झाली. त्यात कॉ. देशमुख यांनी विजयश्री मिळविली. मात्र १९६२ ची निवडणूक बी.जे. खताळ(काँग्रेस), कॉ. दत्ता देशमुख(लाल निशाण पक्ष) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) अशी तिरंगी झाली. त्यात खताळ(काँग्रेस) प्रथमच विजयी झाले. १९६७ सालच्या दुरंगी लढतीत भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत करून पुन्हा खताळ विजयी झाले. १९७२ ला पुन्हा दुरंगी लढतीत खताळ (काँग्रेस) यांनी मोहनराव गाडे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९७८ साली भाऊसाहेब थोरात यांनी दुरंगी लढत करून खताळ(म.स.कॉ.) यांचा पराभव केला. १९८० सालच्या दुरंगी लढतीत खताळ(काँग्रेस) यांच्याकडून संभाजी थोरात यांना पराभव पत्कारावा लागला. १९८५ साली दुरंगी निवडणूक झाली. आयात उमेदवार शकुंतला थोरात(काँग्रेस) यांना तिकीट देण्यात आले. त्यांना बाळासाहेब थोरात(अपक्ष) यांनी पराभूत करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. १९९० साली दुरंगी लढतीत थोरात यांनी वसंतराव गुंजाळ(भारतीय जनता पक्ष), १९९५ साली बापूसाहेब गुळवे(अपक्ष), १९९९ साली बापूसाहेब गुळवे(शिवसेना), २००४ साली संभाजी थोरात(शिवसेना), २००९ साली बाबासाहेब कुटे(शिवसेना) यांना पराभूत केले. १९९० ते २००९ अशा पाचही निवडणुका दुरंगी झाल्या आहेत. पण, २०१४ सालच्या या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप-मित्रपक्षांची महायुती दुभंगल्याने चित्र एकदम पालटून गेले. प्रत्येक पक्षाकडून उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने राज्यासह संगमनेर तालुक्यात प्रथमत: पंचरंगी लढती होत आहेत. (प्रतिनिधी)