शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

खत टाकायला गेलेल्या बाप-लेकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; गावकऱ्यांचा महावितरणवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:56 IST

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Jamkhed Accident: अहिल्यानगरमध्ये उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेतातील विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील ग्रामपंचायतीचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (४२) व त्यांचा मुलगा गणेश शिकारे (१५) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

बाळगव्हाण येथे शिकारे वस्ती येथे राहणारे काकासाहेब व त्यांचा मुलगा गणेश हे दोघे सोमवारी शेतात गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय व काही ग्रामस्थांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला. तेव्हा दोघांचाही मृतदेह शेतात विजेच्या तुटलेल्या तारेजवळ आढळून आला. गावात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील विजेच्या तारा तुटल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी वीज तारा तुटल्या असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दोघांचा बळी गेला असल्याचे बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी

या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेसाठी महावितरण जबाबवदार असल्याचे म्हटलं. "शेतात खत टाकण्यासाठी गेले असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून खर्डा (ता. जामखेड) परिसरातील शिकारे वस्ती बाळगव्हाण येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे (४२) आणि त्यांचा मुलगा महेश (१५) या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना आहे. या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या या तारा अद्यापही तशाच पडून आहेत आणि त्यामुळंच या बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला. याला पूर्णतः महावितरण जबाबदार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कधीही भरून न निघणारी हानी लक्षात घेता शिकारे कुटुंबालाही मदत करावी, ही विनंती!," असं रोहित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरAccidentअपघात