शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राशीन वीज कार्यालयात महावितरणच्या अभियंत्यांना शेतक-यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:10 IST

वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला.

राशीन : मुबलक पाणी असूनही केवळ सतत खंडित होणा-या वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला.गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेल्या विजेबाबत जाब विचारून परिसरातील शेतीपंपाचा वीजपुरवठा त्वरित चालू केल्याशिवाय आम्ही येथून उठणार नसल्याची ठोस भूमिका यावेळी संतप्त शेतक-यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र देशमुख यांनी प्रश्नावर मध्यस्थी करून अभियंत्याकडेशुक्रवारी रात्रीपासून शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.यावेळी राजेंद्र देशमुख यांच्यासह राशीन ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मोढळे, विशाल शेटे, बाळू शेटे, सागर मोढळे, विकास भाकरे, महादेव कानगुडे, युवा काँग्रेस अध्यक्ष अविनाश मासाळसह देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील शेकडो शेतकरी हजर होते.दरम्यान, विजेअभावी ज्वारी, हरभरा, मका, तूर, कपाशीसारखे पिकांना पाणी असूनही देता येत नाही. जनावरांच्या पिण्याचा पाणी प्रश्न आहे. अगोदरच विविध अडचणीचा शेतक-यांना सामना करावा लागत असताना विजेमुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. तरी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली.

भारनियमा व्यतिरिक्त राशीन वीज केंद्राला विजपुरवठा पूर्ण दाबाने होतो. विद्युत रोहित्रही पूर्ण क्षमतेचे आहे, पंरतु शेतीपंपाच्या अतिरिक्त दाबामुळे फिडरवरील तारा (जंप) तुटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वीज खंडित होते व अपुरे कर्मचारी असल्याने तो सुरळीत करण्यास विलंब होतो. राशीन वीज केंद्रात शेतीपंपाचे सात व राशीन गावठाणाअंतर्गत चार असे एकूण अकरा फिडर कार्यान्वित आहेत. या सात फिडरवरील विद्युत दाब जास्त असल्याने हे फिडर आठ तासाच्या फरकाने तीन टप्यात चालवले जातात.-कुणाल डेकाटे, सहायक प्रभारी अभियंता, राशीन, वीज केंद्र

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणKarjatकर्जत