शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:21 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे.

लोणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. इतरांसारखे शेतक-यांना केवळ मोर्चे काढायला आम्ही लावले नाहीत, शेतक-यांची सुरक्षितता देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.वाजपेयी सरकारने हाती घेतलेले धोरण पुन्हा एकदा केंद्र सरकारने पुढे नेण्यास प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकात पाटील यांनी केले.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात पाटील बोलत होते. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, सभापती दिपकराव पठारे, सुभाषराव पाटील, राजेश परजणे, अशोकराव भांगरे उपस्थित होते. कारखाना कार्यस्?थळावरील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पन करुन अभिवादन केले.पाटील म्हणाले, केवळ कर्जमाफी देवून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर, शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल. यासाठीच जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या विचारांशी सुसंगत असे आहे. केंद्र सरकारने आता केवळ पाण्यासाठी 24 हजार कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असून, या माध्यमातून बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. मधल्या काळात देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्यांकडून शेतक-यांचा विचार झालाच नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील