शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पंचनामे न केल्याने शेतक-यांनी रस्त्यावर फेकली संत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:25 IST

खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

अहमदनगर : नगर तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री वादळी वारा आणि अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला. त्यात खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.नगर तालुक्यातील खडकी परिसराला संत्रा फळबागांचे आगर मानले जाते. खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, सारोळा कासार या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबागा आहेत. खडकी परिसरात ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास या भागात मोठ्या प्रमाणावर वारा व तुरळक पाऊस झाल्याने तोडणीला आलेल्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी माहिती होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भागात पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मंगळवारी सकाळीच गळालेल्या फळांसह नगर- दौंड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राहुल बहिरट, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठूळे, उपसरपंच रोकडे, केतन निकम, ऋषी कोठूळे, राहुल कोठूळे, अशोक कोठूळे, अमृत कोठूळे, नवनाथ कोठूळे, रतन बहिरट, अर्जुन रोकडे, आदिनाथ गायकवाड, प्रवीण कोठूळे, सुनील कोठूळे, भाऊसाहेब खेंगट यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी शेतक-यांची समजूत काढली. सरकार आपले आहे. आपण या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनास करण्यास सांगू, असे सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली. शेतकºयांनीही आंदोलन मागे घेत फळे रस्त्यावर फेकून प्रशासकीय धोरणांचा निषेध केला व तातडीने पंचनामे करत हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीStrikeसंप