शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:28 IST

पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.

सुदाम देशमुख अहमदनगर : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे वापरतात. मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ममताबाई भांगरे या बुजगावण्याशिवाय शेती करा असा धडा जगाला देत आहेत. पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.देवगाव (ता. अकोले) येथील ममताबाई या हजारांच्यावर चिमण्या-पाखरांच्या अन्नदाता बनल्या आहेत. त्या म्हणतात, शेतकऱ्यांनी पाखरांना दाणापाणी भरविण्याची खबरदारी घ्यायला हवी. मात्र, शेतकरीच आज पाखरांना दूर लोटू पाहत आहेत. जे अयोग्य आहे.माझ्या अंगणात असलेल्या बोगणवेलावर दररोज शेकडो चिमण्या बागडतात. दिवसातून तीन वेळामी त्यांना तांदूळ टाकते. त्यामुळेमी अंगणात गेले तरी चिमण्या चिवचिवाट करुन माझ्यावरील प्रेम व्यक्त करतात. वर्षात तांदळाचे एक पोते मी या चिमण्यांनाच खाऊ घालते.आपल्या शेतातही पाखरांना मुक्त प्रवेश आहे. पाखरे हाकलण्यासाठी मी शेतात कधीही बुजगावणे उभे करत नाही. त्यामुळे पाखरे मनसोक्तपणे पिकांशी खेळतात. याचा फायदा असा होतो की पिकांवर असलेले किटकही पाखरे खाऊन टाकतात.तेच खरे पिकांचे राखण करतात. त्यामुळे माझ्या शेतात पिकांवर रोग येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रासायनिक फवारण्या करण्याचीगरज पडत नाही.पाखरांनी काही अन्न खाल्ले तरी आपणाला चांगले उत्पादन मिळते. पाखरांचा किलबिलाट हे एकप्रकारचे संगीतच असते. त्याचाही पिकांना फायदा मिळतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.>आश्रमशाळांतील मुलांना सेंद्रिय भाजीपालाममताबाई १0 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ‘बायफ’ या संस्थेकडून त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. गांडूळ खताच्या छोट्या गोळ्या त्या तयार करतात. चिखलात भाताच्या रोपांमध्ये या गोळ्या पेरतात. त्यामुळे पिकांना चांगले खत मिळून उत्पादन वाढते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. अकोले तालुक्यातील शेणित, मुतखेल, मान्हेरे या आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना त्यांनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले. त्यामुळे या शाळा आपला भाजीपाला या खतांवरच तयार करतात. सर्वच आश्रमशाळांनी याची अंमलबजावणी केली तर मुलांना सकस अन्न मिळेल, असे ममताबार्इंचे म्हणणे आहे.