शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:28 IST

पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.

सुदाम देशमुख अहमदनगर : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे वापरतात. मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ममताबाई भांगरे या बुजगावण्याशिवाय शेती करा असा धडा जगाला देत आहेत. पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.देवगाव (ता. अकोले) येथील ममताबाई या हजारांच्यावर चिमण्या-पाखरांच्या अन्नदाता बनल्या आहेत. त्या म्हणतात, शेतकऱ्यांनी पाखरांना दाणापाणी भरविण्याची खबरदारी घ्यायला हवी. मात्र, शेतकरीच आज पाखरांना दूर लोटू पाहत आहेत. जे अयोग्य आहे.माझ्या अंगणात असलेल्या बोगणवेलावर दररोज शेकडो चिमण्या बागडतात. दिवसातून तीन वेळामी त्यांना तांदूळ टाकते. त्यामुळेमी अंगणात गेले तरी चिमण्या चिवचिवाट करुन माझ्यावरील प्रेम व्यक्त करतात. वर्षात तांदळाचे एक पोते मी या चिमण्यांनाच खाऊ घालते.आपल्या शेतातही पाखरांना मुक्त प्रवेश आहे. पाखरे हाकलण्यासाठी मी शेतात कधीही बुजगावणे उभे करत नाही. त्यामुळे पाखरे मनसोक्तपणे पिकांशी खेळतात. याचा फायदा असा होतो की पिकांवर असलेले किटकही पाखरे खाऊन टाकतात.तेच खरे पिकांचे राखण करतात. त्यामुळे माझ्या शेतात पिकांवर रोग येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रासायनिक फवारण्या करण्याचीगरज पडत नाही.पाखरांनी काही अन्न खाल्ले तरी आपणाला चांगले उत्पादन मिळते. पाखरांचा किलबिलाट हे एकप्रकारचे संगीतच असते. त्याचाही पिकांना फायदा मिळतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.>आश्रमशाळांतील मुलांना सेंद्रिय भाजीपालाममताबाई १0 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ‘बायफ’ या संस्थेकडून त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. गांडूळ खताच्या छोट्या गोळ्या त्या तयार करतात. चिखलात भाताच्या रोपांमध्ये या गोळ्या पेरतात. त्यामुळे पिकांना चांगले खत मिळून उत्पादन वाढते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. अकोले तालुक्यातील शेणित, मुतखेल, मान्हेरे या आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना त्यांनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले. त्यामुळे या शाळा आपला भाजीपाला या खतांवरच तयार करतात. सर्वच आश्रमशाळांनी याची अंमलबजावणी केली तर मुलांना सकस अन्न मिळेल, असे ममताबार्इंचे म्हणणे आहे.