शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या फायरिंगसाठी जमीन देणार नाही; राहुरी, नगर तालुक्यातील शेतक-यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:02 IST

लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने नगर, राहुरी, पारनेरमधील शेतक-यांनी गुरुवारी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन सरकारी असो वा खासगी, लष्कराला आता कोणतीही जमीन देणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

अहमदनगर : लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने नगर, राहुरी, पारनेरमधील शेतक-यांनी गुरुवारी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन सरकारी असो वा खासगी, लष्कराला आता कोणतीही जमीन देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. सरकारी जी जमीन घेण्यात येणार आहे, ती जमीन लष्कर अगोदरच वापरत असून, शेतक-यांनी उगाच भीती बाळगू नये, असे जिल्हाधिका-यांनी शेतक-यांना सांगितले.नागपूरमधील कोराडी आणि अन्सारी येथील लष्कर क्षेत्रातील जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार असून, त्याबदल्यात लष्कराच्या अहमदनगर येथील फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन दिली जाणार आहे. याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह महसूल विभाग, पर्यटन विभाग, तसेच लष्कराच्या अधिका-यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. नगरच्या फायरिंग रेंजसाठी पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्यांतील सरकारी जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे के.के. रेंज परिसरातील ग्रामस्थ धास्तावले असून, त्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना भेटले. यावेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवाजीराव गाडे, अण्णासाहेब बाचकर, गंगाधर जाधव, बापूसाहेब रोकडे, गोरक्षनाथ कदम, विलास जाधव, तुकाराम गुंजाळ, सकाहरी जाधव, विलास गि-हे, शिवाजी आघाव आदींसह शेतकरी उपस्थित होते.सरकारचा निर्णय काहीही असो, यापुढे आम्ही जमिनी देणार नाहीत, या मुद्द्यावर ग्रामस्थ ठाम होते. या परिसरातील लोकांनी आतापर्यंत, के. के. रेंजसाठी लष्कराला, तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ अशी अनेकदा सरकारला जमीन दिली. परंतु त्याचा पूर्ण मोबदला किंवा विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. अशात पुन्हा आमच्या जमिनी घेऊन भूमिहीन करण्याचा डाव आहे. शासन जरी या भागातील सरकारी जमीन घेणार असले, तरी त्या शेजारी असलेले खासगी क्षेत्रही बाधीत होणार आहे. त्यामुळे आम्ही जमिनी देणार नाही, असे शेळके, गाडे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या जमिनी घेण्याचे प्रस्तावित आहे, त्या सरकारी आहेत. शिवाय ती जमीन सध्या लष्कराकडेच आहे. ही प्रक्रिया जेव्हा होईल, तेव्हा सर्वांचे म्हणणे विचारात घेतले जाईल. यावर हरकती, सुनावण्या होतील. त्यामुळे शेतक-यांनी उगाच भीती बाळगू नये. तुमचे आताचे म्हणणे सरकारला कळवू.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवानMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार