शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सरकारकडून खोटेपणाचा कळस, मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:49 IST

९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले़स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही अण्णांनी सोमवारी व्यक्त केला़ उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सरकारने किती खोटं बोलावं याला काही सीमा आहे़ सरकारचे मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. अजून पाच दिवस तरी आपणाला काही होणार नाही. वजन कमी होतंय़ थोडाफार त्रास होत आहे. पण मी उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.जेटली, स्वराज गप्प का?१७ व १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल कायदा बिल लोकसभेत मांडले़ त्यावेळी भाजपचे सध्याचे मंत्री सुषमा स्वराज व अरुण जेटली लोकपाल कायद्याबाबत जे बोलत होते. ते आता सत्तेवर आल्यावर बोलायला तयार नाहीत. चूप झालेत सर्व. लोकपाल शब्दाचीच त्यांना अ‍ॅलर्जी झालीय. ज्या लोकपाल आंदोलनामुळे केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. पण आता कोट्यवधी जनतेशी ते गद्दारी करीत आहेत़

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे