शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

तज्ज्ञांचे मत : बोलीभाषेत बदल करताना उडणार गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:22 IST

यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे.

अहमदनगर : यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे ही पद्धत व्यवहार्य नसून यामुळे बोलीभाषेत, तसेच दैनंदिन व्यवहारात नव्या-जुन्या पिढीचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञांनी दिल्या.यंदाच्या दुसरीच्या गणित पुस्तकात संख्यावाचन करताना बेचाळीसऐवजी चाळीस दोन, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन असा बदल करत ही पद्धत मुलांना शिकवण्यास सांगितले आहे. बदललेली ही अंक वाचन पद्धत व्यवहार्य आहे की गोंधळ उडवणारी आहे, याबाबत ‘लोकमत’ने शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालकांशी चर्चा केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.काहींच्या मते ही गणित वाचन पद्धत विद्यार्थ्यांसाठी वरून सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात गोंधळ उडवणारी आहे. बोलीभाषेतील काही म्हणी, आडनाव, तारखा या पारंपरिक अंक वाचन पद्धतीने उच्चारल्या जातात.सध्या विद्यार्थ्यांनी जरी बदललेली वाचन पद्धत अंगिकारली, तरी इतर मराठीच्या पुस्तकांत किंवा व्यवहारात जुन्याच पद्धतीने संख्येची फोड केलेली असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम उडणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असा काहिसा सूर या चर्चेतून समोर आला.दुसरीकडे काहींच्या मते नवी संख्या वाचन पद्धत सुटसुटीत आहे. इंग्रजीमध्ये सध्या आपण ती शिकतो आहोतच. मग मराठीत विरोध का? त्यामुळे ही पद्धत सोपी व मुलांना फायदेशीर आहे.लहान संख्येपुरती नवीन वाचन पद्धत ठिक आहे. परंतु तीन, चार अंकी संख्या वाचन करताना अडचण होणार आहे. गणिताचे भाषिक ज्ञान समाजात रूजलेले आहे. ते बदलण्यात अर्थ नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित होतील. यातून गणितापुरते जोडशब्द जरी टाळले, तरी इतर जोडशब्दांचे काय? त्यामुळे हा बदल योग्य नसून त्याचा पुनर्विचार व्हावा व पूर्वीचीच पद्धत चालू ठेवावी. - संजय कळमकर, शिक्षक, साहित्यिकसध्या बऱ्याचशा मराठी शाळांत सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळे नवीन अंक वाचन पद्धत इंग्रजी अंकगणिताशी ताळमेळ घालणारी आहे. पूर्वीच्या पद्धतीत काही आकडे लिहिण्यास व उच्चारण्यासही अवघड होते, त्यामुळे संख्याज्ञान न होता मुले अप्रगत राहायची. नवीन वाचन पद्धत मुलांना समजण्यास सोपी आहे. - राजू बनसोडे, शिक्षक, जि. प. शाळा वाकडी, ता. राहाताही पद्धत नवीन नाही. मागील वर्षीही पहिलीच्या पुस्तकात अशी अंक ओळख दिलेली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनेमध्ये स्पष्ट लिहिले आहे की संख्या शब्दात लिहिताना विद्यार्थ्यांकडून एकच प्रकार अपेक्षित आहे उदा. ४७ साठी चाळीस सात किंवा सत्तेचाळीस. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी पद्धत सोयीची व सोपी वाटते तिचा वापर शिक्षकांनी करावा. - विक्रम अडसूळ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकनवीन पद्धत कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य नाही. इंग्रजीत इलेव्हनला आपण टेन वन असे म्हणत नाही. मग मराठीत असे बदल करण्याचे कारण नाही. शासनाने कोणतीही चर्चा न करता एवढा मोठा बदल करणे चुकीचे आहे. जोडाक्षर सोपे करण्यासाठी हे केले असेल तर अंक वाचन सोडून इतर ठिकाणी येणाºया जोडाक्षराचे काय? त्यामुळे पारंपरिक अंक वाचन पद्धतच बरोबर आहे. - डॉ. सर्जेराव निमसे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय