शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तज्ज्ञांचे मत : बोलीभाषेत बदल करताना उडणार गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:22 IST

यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे.

अहमदनगर : यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे ही पद्धत व्यवहार्य नसून यामुळे बोलीभाषेत, तसेच दैनंदिन व्यवहारात नव्या-जुन्या पिढीचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञांनी दिल्या.यंदाच्या दुसरीच्या गणित पुस्तकात संख्यावाचन करताना बेचाळीसऐवजी चाळीस दोन, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन असा बदल करत ही पद्धत मुलांना शिकवण्यास सांगितले आहे. बदललेली ही अंक वाचन पद्धत व्यवहार्य आहे की गोंधळ उडवणारी आहे, याबाबत ‘लोकमत’ने शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालकांशी चर्चा केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.काहींच्या मते ही गणित वाचन पद्धत विद्यार्थ्यांसाठी वरून सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात गोंधळ उडवणारी आहे. बोलीभाषेतील काही म्हणी, आडनाव, तारखा या पारंपरिक अंक वाचन पद्धतीने उच्चारल्या जातात.सध्या विद्यार्थ्यांनी जरी बदललेली वाचन पद्धत अंगिकारली, तरी इतर मराठीच्या पुस्तकांत किंवा व्यवहारात जुन्याच पद्धतीने संख्येची फोड केलेली असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम उडणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असा काहिसा सूर या चर्चेतून समोर आला.दुसरीकडे काहींच्या मते नवी संख्या वाचन पद्धत सुटसुटीत आहे. इंग्रजीमध्ये सध्या आपण ती शिकतो आहोतच. मग मराठीत विरोध का? त्यामुळे ही पद्धत सोपी व मुलांना फायदेशीर आहे.लहान संख्येपुरती नवीन वाचन पद्धत ठिक आहे. परंतु तीन, चार अंकी संख्या वाचन करताना अडचण होणार आहे. गणिताचे भाषिक ज्ञान समाजात रूजलेले आहे. ते बदलण्यात अर्थ नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित होतील. यातून गणितापुरते जोडशब्द जरी टाळले, तरी इतर जोडशब्दांचे काय? त्यामुळे हा बदल योग्य नसून त्याचा पुनर्विचार व्हावा व पूर्वीचीच पद्धत चालू ठेवावी. - संजय कळमकर, शिक्षक, साहित्यिकसध्या बऱ्याचशा मराठी शाळांत सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळे नवीन अंक वाचन पद्धत इंग्रजी अंकगणिताशी ताळमेळ घालणारी आहे. पूर्वीच्या पद्धतीत काही आकडे लिहिण्यास व उच्चारण्यासही अवघड होते, त्यामुळे संख्याज्ञान न होता मुले अप्रगत राहायची. नवीन वाचन पद्धत मुलांना समजण्यास सोपी आहे. - राजू बनसोडे, शिक्षक, जि. प. शाळा वाकडी, ता. राहाताही पद्धत नवीन नाही. मागील वर्षीही पहिलीच्या पुस्तकात अशी अंक ओळख दिलेली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनेमध्ये स्पष्ट लिहिले आहे की संख्या शब्दात लिहिताना विद्यार्थ्यांकडून एकच प्रकार अपेक्षित आहे उदा. ४७ साठी चाळीस सात किंवा सत्तेचाळीस. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी पद्धत सोयीची व सोपी वाटते तिचा वापर शिक्षकांनी करावा. - विक्रम अडसूळ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकनवीन पद्धत कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य नाही. इंग्रजीत इलेव्हनला आपण टेन वन असे म्हणत नाही. मग मराठीत असे बदल करण्याचे कारण नाही. शासनाने कोणतीही चर्चा न करता एवढा मोठा बदल करणे चुकीचे आहे. जोडाक्षर सोपे करण्यासाठी हे केले असेल तर अंक वाचन सोडून इतर ठिकाणी येणाºया जोडाक्षराचे काय? त्यामुळे पारंपरिक अंक वाचन पद्धतच बरोबर आहे. - डॉ. सर्जेराव निमसे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय