शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

पीक विम्याला मुदतवाढ

By admin | Updated: August 1, 2014 00:23 IST

विखे यांची माहिती : १६ आॅगस्टपर्यंत सहभागी होता येणार

बाभळेश्वर (अहमदनगर) : पावसाअभावी यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पाऊस झाल्याने अनेक भागात उशीरा पेरण्या झाल्या़ त्यामुळे अनेक शेतकरी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते़ उशीरा पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेत सहभाग घेता यावा, यासाठी विमा योजनेची दुसऱ्यांदा मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळून तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येते़ या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत विमा रक्कम भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती़ मात्र यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने वेळेत पेरण्या होऊ शकल्या नाहीत़ उशीरा पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती़ ज्या शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत १६ आॅगस्टपर्यंत सहभागी होता येणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)