शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महाराष्ट्र बलात्काराच्या घटनेत तिस-या स्थानी - खुशालचंद बाहेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:19 IST

महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.

शिर्डी : गेल्या दहा वर्षांत बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले असून, बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र देशात तिस-या स्थानावर असल्याचे सांगत महिला विषयक कायदे कडक करूनही गुन्हे घडण्याच्या प्रमाणात घट होत नसल्याबद्दल व गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण कमी असल्याबद्दल औरंगाबादचे निवृत्त पोलीस उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी चिंता व्यक्त केली.महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ. नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सत्रासाठी राज्य महिला आयोगाच्या सदस्य विंदा किर्तीकर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील, उद्योजिका सुप्रिया बडवे, संगमनेरच्या दुर्गाताई तांबे, सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या संगीता मालकर, शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, स्वाती किशोर बोरावके, शितल दीपक वारूळे आदींसह मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती.महिलांसाठीच्या स्वंयसेवी संस्थांना कायदेशीर करावे, गुन्ह्यांच्या तपासाची पद्धत निश्चित करावी, असेही बाहेती यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून आमदार गो-हे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करीत महिला विषयींच्या कायद्याच्या कठोर व निर्दोष अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या घटनातील गुन्हेगारांना नक्की शिक्षा होतील, असा फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकताही गो-हे यांनी व्यक्त केली.यावेळी महिला विषयक कायद्यांची अंमलबजावणीची कार्यपद्धती यावर सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील, कायद्याची अंमलबजावणी व महिला आयोगाची भूमिका यावर विंदा किर्तीकर, महिला उद्योग धोरणावर सुप्रिया बडवे यांनी आपली मते मांडली.दुपारच्या सत्रात भारतीय दंड संहिता, सायबर क्राईम, कौटुबिंक हिंसाचार, प्रसूतिपूर्व लिंग निदान, कौटुंबिक न्यायालयातील कार्यपद्धती, तिहेरी तलाक, हिंदू वारसा, बालक लैंगिक कृत्ये सरंक्षण, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ, बलात्कार पीडित महिलांसाठी मेडिकल प्रोटोकॉलची आवश्यकता आदी बाबींवर गट चर्चा करण्यात आली. यासाठी अ‍ॅड. संभाजी बोरुडे, अ‍ॅड. निशा शिऊरकर, अ‍ॅड. पूनम गुजराती, अ‍ॅड. जयंत जोशी, जेहलम जोशी, डॉ. दर्शना धोंडे आदी वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. संगीता मालकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिता शिंदे, ज्योती कोटकर, रमेश शेलार, अश्विनी शिंदे, विभावरी कांबळे, भाऊसाहेब मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे आदींनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी