शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतरही रेल्वेला अपेक्षित प्रवासी मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST

राज्य शासनाने कोरोना आटोक्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात काही प्रमाणात निर्बंध उठवले. त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार सुरळीत झाले. लॉकडाऊनमध्ये रेल्वेलाही ...

राज्य शासनाने कोरोना आटोक्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात काही प्रमाणात निर्बंध उठवले. त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार सुरळीत झाले. लॉकडाऊनमध्ये रेल्वेलाही प्रवासी नव्हते. अनलॉकनंतर रेल्वेला प्रवासी उपलब्ध होऊन रेल्वेची झालेली आर्थिक भरपाई भरून निघेल असे वाटत असताना अजूनही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. नगर जिल्ह्यातून दौंड-मनमाड हा मुख्य रेल्वेमार्ग जातो. त्याअंतर्गत एकूण सोळा स्थानके या मार्गावर आहेत. सध्या या मार्गावरून ३० एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत, मात्र मध्यमवर्गीय प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. त्याचाही फटका रेल्वेला बसत आहे.

रविवारी राखी पौर्णिमा असल्याने तसेच सध्या अनलॉक झाल्याने रेल्वे आरक्षण वाढेल असे वाटत असताना अपेक्षित प्रतिसाद रेल्वेला मिळालेला नाही. लॉकडाऊनपूर्वी नगर शहर रेल्वेस्थानकातून साधारण १५०० प्रवासी दररोज प्रवास करत होते सध्या ती संख्या ७०० ते १०००च्या आसपास आहे. म्हणजे अजूनही रेल्वे प्रवाशांची संख्या पूर्वपदावर आलेली नाही.

------------------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

सध्या नगर जिल्ह्यातून ३० एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, झेलम, कर्नाटक, गोवा, संपर्क क्रांती (२), हमसफर (सुपरफास्ट), हबीबगंज, आझाद हिंद (सुपरफास्ट), पाटलीपुत्र, गरीबरथ, दुरांतो, वाराणसी (दोन), ज्ञानगंगा, दूरभंगा, शिर्डी येथून (सात), फेस्टिवल, कोविड स्पेशल अशा तीस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

---------------

गाड्यांना वेटिंग नाही

रेल्वे गाड्यांना सध्या वेटिंग नाही. प्रवाशांना सहजासहजी जागा मिळत आहे. स्लीपर कोच, तसेच एसीमध्येही बुकिंग मिळते.

------------

पॅसेंजर सुरू झाल्यावर वाढू शकतात प्रवासी

वर्षभरापूर्वी लॉकडाऊनमध्ये सर्वच रेल्वे गाड्या बंद होत्या. त्यानंतर जेव्हा काही प्रमाणात गाड्या सुरू झाल्या, तेव्हा प्रवाशांची संख्या खूपच कमी होती. आता हळूहळू प्रवासी संख्या वाढत असून, ती ५० टक्क्यांपर्यंत आली आहे. अजूनही ५० टक्के प्रवाशांची रेल्वेला प्रतीक्षा आहे. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यानंतर यात काहीशी वाढ होऊ शकते.