शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

साईसंस्थान विश्वस्तांच्या पात्रतेच्या पुनर्रीक्षणासाठी त्रयस्थ समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:25 IST

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचे पुनर्रीक्षण आणि पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी त्रयस्त समितीची स्थापना केली आहे.

शिर्डी : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचे पुनर्रीक्षण आणि पुनर्विचार करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी त्रयस्त समितीची स्थापना केली आहे.राज्याच्या विधी व न्याय विभागाने मंगळवारी रात्री हा अध्यादेश काढला़ या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय समितीत राज्याच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांचा समावेश आहे़ ही समिती उच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रतेचे पुन:पर्रीक्षण आणि पुनर्विचार करून त्यांच्या शिफारशीसह आपला अहवाल शासनास सादर करणार आहे़ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते़ गेल्या महिन्यात ९ आॅक्टोबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम केल्याने राज्य शासनाने ही स्वतंत्र व निपक्ष समिती नियुक्त केली आहे़ अध्यादेशात समितीला अहवाल सादर करण्यासाठी कोणताही कार्यकालाची मर्यादा घालण्यात आलेली नाही़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी