शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

अतिक्रमणधारक होणार मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:43 IST

अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल झालेले, पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा चालविलेल्या घटना आत्तापर्यंत सर्वांनाच परिचयाच्या झाल्या आहेत़

अहमदनगर : अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल झालेले, पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा चालविलेल्या घटना आत्तापर्यंत सर्वांनाच परिचयाच्या झाल्या आहेत़ मात्र, आता अतिक्रमणांवर हातोडा चालविण्याऐवजी अतिक्रमण करणाऱ्यांनाच त्या जागेची मालकी देण्यात येणार आहे़ त्यासाठी राज्यातील १ लाख व नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणांची मालकी अतिक्रमणधारकांना देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़अतिक्रमित जागेचे क्षेत्र ठरवून त्यावर दंड आकारुन ती जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती ग्रामसेवकांकडून मागविण्यात येत आहे़ पहिल्या टप्यात ३ हजार १४० अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असून, ज्या जागांची माहिती अपूर्ण होती, त्या गावांतील ग्रामसेवकांची शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक झाली़ या बैठकीत अपूर्ण माहिती असलेल्या जागांचा तपशील देत संबंधित ग्रामसेवकांकडून त्या जागेची माहिती, फोटो मागविण्यात आले़ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी ग्रामसेवकांना अपूर्ण माहितीबाबत सूचना दिल्या़ गावस्तरावर गावठाण हद्दीतील अतिक्रमणांची संख्या मोठी आहे़ पहिल्या टप्प्यात ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ अतिक्रमणधारकांकडून जागेच्या क्षेत्रावर निश्चित दंड आकारुन त्यांना ती जागा नियमित करुन देण्यात येणार आहे़ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जागांबाबत जिल्हा परिषद निर्णय घेणार आहे़ तर इतर विभागाच्या जागांचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे़जिल्हा परिषदेच्या सुमारे ८ हजार जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहेत़ या अतिक्रमणांवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये वारंवार वादंग झाले आहेत़ प्रत्येक सभेला अधिकाºयांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्यांना दिले़ मात्र, अद्याप जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात आलेली नाहीत़ त्याशिवाय काही नगरपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या जागा बळकावून त्यावर पक्की बांधकामे केली आहेत, अशा नगरपालिकांकडून भाडे वसूल करण्याचा ठरावही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता़ मात्र, त्यावरही पुढे काहीच झालेले नाही़गावठाण हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ त्यासाठी माहिती भरण्याचे काम सुरु आहे़ अतिक्रमित जागेच्या क्षेत्रानुसार ठराविक रक्कम आकारुन त्या जागा नियमित करण्यात येणार आहेत़ -प्रशांत शिर्के, उपमुख्यकार्यकारीअधिकारी

अतिक्रमणधारक होणार मालकअहमदनगर : अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल झालेले, पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा चालविलेल्या घटना आत्तापर्यंत सर्वांनाच परिचयाच्या झाल्या आहेत़ मात्र, आता अतिक्रमणांवर हातोडा चालविण्याऐवजी अतिक्रमण करणाऱ्यांनाच त्या जागेची मालकी देण्यात येणार आहे़ त्यासाठी राज्यातील १ लाख व नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणांची मालकी अतिक्रमणधारकांना देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़अतिक्रमित जागेचे क्षेत्र ठरवून त्यावर दंड आकारुन ती जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे़ त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती ग्रामसेवकांकडून मागविण्यात येत आहे़ पहिल्या टप्यात ३ हजार १४० अतिक्रमण झालेल्या जागांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असून, ज्या जागांची माहिती अपूर्ण होती, त्या गावांतील ग्रामसेवकांची शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक झाली़ या बैठकीत अपूर्ण माहिती असलेल्या जागांचा तपशील देत संबंधित ग्रामसेवकांकडून त्या जागेची माहिती, फोटो मागविण्यात आले़ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी ग्रामसेवकांना अपूर्ण माहितीबाबत सूचना दिल्या़ गावस्तरावर गावठाण हद्दीतील अतिक्रमणांची संख्या मोठी आहे़ पहिल्या टप्प्यात ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ अतिक्रमणधारकांकडून जागेच्या क्षेत्रावर निश्चित दंड आकारुन त्यांना ती जागा नियमित करुन देण्यात येणार आहे़ जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जागांबाबत जिल्हा परिषद निर्णय घेणार आहे़ तर इतर विभागाच्या जागांचा निर्णय संबंधित विभाग घेणार आहे़जिल्हा परिषदेच्या सुमारे ८ हजार जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहेत़ या अतिक्रमणांवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये वारंवार वादंग झाले आहेत़ प्रत्येक सभेला अधिकाºयांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्यांना दिले़ मात्र, अद्याप जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात आलेली नाहीत़ त्याशिवाय काही नगरपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या जागा बळकावून त्यावर पक्की बांधकामे केली आहेत, अशा नगरपालिकांकडून भाडे वसूल करण्याचा ठरावही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता़ मात्र, त्यावरही पुढे काहीच झालेले नाही़गावठाण हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३ हजार १४० अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत़ त्यासाठी माहिती भरण्याचे काम सुरु आहे़ अतिक्रमित जागेच्या क्षेत्रानुसार ठराविक रक्कम आकारुन त्या जागा नियमित करण्यात येणार आहेत़ -प्रशांत शिर्के, उपमुख्यकार्यकारीअधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद