शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:00 IST

यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

अहमदनगर : यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

दहावीचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ६९ हजार ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क््यांनी निकाल वाढला. म्हणजे यंदा जादा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी  सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरयंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ५५० विद्यार्थ्यांची आहे. सर्वाधिक ३४ हजार जागा विज्ञानसाठी एकूण ७६ हजार ६६० जागांपैकी ३४ हजार (४४.३५ टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर २९ हजार ६०० जागा कला शाखेसाठी, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी, तर २ हजार १२० जागा संयुक्त शाखेसाठी आहेत. 

विज्ञान शाखेत प्रवेश वाढणार नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ५० टक्क््यांच्या पुढे प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. दहावीत सुमारे ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील ५० टक्के म्हणजे ३३ हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तिच स्थिती असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण