शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

कोपरगाव तालुक्यात १७ पाणी योजनांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : ३१ मार्चअखेर संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम हाती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : ३१ मार्चअखेर संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोपरगाव तालुक्यातील दोन वर्षापासून थकबाकी न भरणाऱ्या १५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणीपुरवठा योजनाचे वीज कनेक्शन बुधवारपर्यंत तोडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित केल्याने या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे असून ७५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी कोपरगाव महावितरण कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ५५ गावे आहेत. तर उर्वरित २४ गावे ही राहाता उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात. कोपरगाव कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १५ ग्रामपंचायतींचा तर राहाता उपविभागांतर्गत २ गावच्या असा एकूण १७ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. यात धोंडेवाडी ग्रामपंचायतीची ८ लाख ६१ हजार ६३७ सर्वाधिक तर मळेगाव थडी २० हजार ९२४ इतकी सर्वात कमी थकबाकी आहे.

.............

गावांची थकबाकी अशी..

येसगाव- ७४,२११.

अंचलगाव दोन योजना- १,००,५४०.

माहेगाव देशमुख - ६२,२८५.

कुंभारी - २५,९३१.

हिंगणी- १,७७,४३८.

करंजी- १,२८,६९२.

मळेगाव थडी -२०,९२४.

कारवाडी- मंजूर-४,९२,७१४.

वेळापूर - ५७,०३६.

चासनळी - १,४९,१९२.

हंडेवाडी- १,३३,०७३.

वडगाव - १,१९,६५४.

कोळगाव थडी दोन योजना- ६,९०,२८४.

सडे -५,८८,६७७

धोंडेवाडी-८,६१,६३७

..................

आजी-माजी आमदारांच्या गावातील वीज कट

कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या माहेगाव देशमुख ग्रामपंचायत तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा तोडला आहे. येसगाव ग्रामपंचायत ही गेली अनेक वर्ष कोल्हे यांच्याच ताब्यात आहे.

........

मार्चअखेर सर्वच प्रकारच्या ग्राहकांची विजेची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात आदेश आहेत. वरिष्ठांकडून थकबाकी वसूल होत नसेल तर थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करून थकबाकी वसूल करा, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही मोहीम हाती घेतली आहे.

- दिनेश चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, कोपरगाव.

..............

गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीची पाणीपट्टीची वसुलीच झालेली नाही. त्यामुळे वीजबिल भरता आली नाहीत. यापूर्वी असा प्रसंग निर्माण झाल्यास १४ व्या वित्त आयोगाचा निधी ४५ दिवस वापरायला मिळत होता. त्यातून वीजबिल भरून पाणीपट्टी वसूल झाल्यानंतर घेतलेली रक्कम पुन्हा १४ व्या वित्त आयोगात जमा केली जात होती. परंतु तो आयोग आता संपला असून १५ व्या वित्त आयोगात तशी तरतूद नाही. त्यामुळे अडचणीचे ठरत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवकांची बैठक घेणार आहे.

- सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव.