शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरणातून आठ हजार क्युसेकने पाणी सोडले

By सुदाम देशमुख | Updated: November 26, 2023 17:14 IST

भंडारदरा व निळवंडे धरणातूनच सर्व पाणी सोडले जाणार आहे.

राजूर (जि. अहमदनगर) : रविवारी दुपारपासून  निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी झेपावले आहे. या धरणातून ८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.

जायकवाडीसाठी नगर जिल्ह्यातील प्रवरा समूहातून ३.३६ दलघफू पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिले आहेत. मात्र नगर जिल्ह्यातील शेतकरी तसेच नेत्यांचा पाणी सोडण्यास विरोध होता. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत साशंकता होती.मात्र शुक्रवारी या बाबतचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री दहा वाजता  निळवंडे धरणातून शंभर क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता.

टप्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार होती. मात्र असे न करता रविवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून वीज निर्मितीसाठी ३२५ तर स्पीलवे मधून ७ हजार ६७५ असे एकूण ८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. रविवारी दुपारी विसर्गात वाढ करते वेळी निळवंडे धरणातील पाणीसाठा ८ हजार १०० दलघफु इतका होता.

भंडारदरा व निळवंडे धरणातूनच सर्व पाणी सोडले जाणार आहे. यामुळे भंडारदरा धरणाच्या विसर्गातही रविवारी दुपारी साडे बारा वाजता धरणाचे दोन्ही लोखंडी वक्र दरवाजे चार फुटाणे उचलत स्पिलवेमधून ७ हजार १८० तर वीज निर्मितीसाठी ८२० असे एकूण ८ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरूवात झाली. रविवारी दुपारी पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ९ हजार ८९ दलघफु इतका होता.

दरम्यान, भंडारदराचे पाणी निळवंडे धरणात जमा होते व निळवंडेमधून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावे, वस्त्यांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरण