शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

शिक्षणतज्ज्ञ सर्जेराव निमसे म्हणतात...परीक्षा न झाल्यास महाराष्ट्राची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:25 IST

अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर डॉ. निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही शाखेच्या अंतिम परीक्षांना वेगळे महत्व असते. सध्या विद्यापीठ पातळीवर परीक्षांची सर्व तयारी झालेली आहे. विद्यापीठांनी त्यावर खर्चही केलेला आहे. विद्यार्थी तयार आहेत, पालकांची हरकत नाही, मग शासन परीक्षांना नकारघंटा का देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी ही घेतलीच पाहिजे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. 

परीक्षा न घेता दिलेली ‘उसणी’ पदवी घेऊन आपला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोणत्या तोंडाने मिरवणार? राष्ट्रीय पातळीवर तो इतर ठिकाणी पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल खचेल. शिवाय करिअरच्या दृष्टीनेही त्याला याचा फटका बसणार आहे. 

केवळ अंतिम सत्राचीच परीक्षा घ्यायची असल्याने तसेही विद्यार्थी कमीच आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. महाविद्यालयांकडे स्टाफ मुबलक आहे. विद्यार्थी व पालकांची तयारी आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घेणेच संयुक्तिक ठरेल, असे मत डॉ. निमसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी