शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पावसामुळे पारनेर तालुक्यातील फुल शेतीचे कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:35 IST

गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसामुळे फुलशेतीत पाणी साठलेफुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागलेफुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली.फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही

सुपा : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व सुपा परिसरातील फुल उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुले भिजल्यामुळे भाव गडगडले असून, शेतक-यांचा वाहतूक खर्चही निघत नाही़तालुक्यातील सुपा परिसर व गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. दीपावलीच्या काळातच नेमके परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे फुलशेतीत पाणी साठले तर फुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागले. काही फुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली. कल्याणला शेवंतीला दहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने फुले तोडण्याचा व वाहतुकीचाही खर्च भागत नसल्याचे पाडळी येथील फुल उत्पादक विजय धोंडिबा दावभट यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेवंती लागवडीस उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फुले उमलली नाही. या दोन्ही उत्सव काळात फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवाचे व नवरात्रोत्सवाच्या प्रत्येकी १०-१० दिवसात चांगले पैसे होतात. परंतु या वर्षी या काळात फुले न फुलल्याने उत्पन्न बुडाले. त्यानंतर दिवाळीतही पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुपा परिसरातील गावाना नगर, पुणे रोडमुळे तातडीने फुले बाजारात पाठवत येतात तर गोरेगाव, हिवरे कोर्डा, पाडळी या गावातून फुले नगरसह कल्याण मार्केटला फुले पाठविली जातात.बाहेरच्या राज्यातून व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करतात़ या वर्षीही बाहेरचे व्यापारी आले. परंतु पावसाने फुलझाडे आडवी झाली, फुले खराब झाले. त्यामुळे मागणी असून फुले खराब झाल्याने नगदी उत्पन्न घटले. काही शेतक-यांचे संपूर्ण पीकच वाया गेले.मार्केटला जाणा-या फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. त्यामुळे शेतक-यांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आप्पा नरसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीRainपाऊस