शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पावसामुळे पारनेर तालुक्यातील फुल शेतीचे कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:35 IST

गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसामुळे फुलशेतीत पाणी साठलेफुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागलेफुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली.फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही

सुपा : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व सुपा परिसरातील फुल उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुले भिजल्यामुळे भाव गडगडले असून, शेतक-यांचा वाहतूक खर्चही निघत नाही़तालुक्यातील सुपा परिसर व गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. दीपावलीच्या काळातच नेमके परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे फुलशेतीत पाणी साठले तर फुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागले. काही फुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली. कल्याणला शेवंतीला दहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने फुले तोडण्याचा व वाहतुकीचाही खर्च भागत नसल्याचे पाडळी येथील फुल उत्पादक विजय धोंडिबा दावभट यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेवंती लागवडीस उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फुले उमलली नाही. या दोन्ही उत्सव काळात फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवाचे व नवरात्रोत्सवाच्या प्रत्येकी १०-१० दिवसात चांगले पैसे होतात. परंतु या वर्षी या काळात फुले न फुलल्याने उत्पन्न बुडाले. त्यानंतर दिवाळीतही पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुपा परिसरातील गावाना नगर, पुणे रोडमुळे तातडीने फुले बाजारात पाठवत येतात तर गोरेगाव, हिवरे कोर्डा, पाडळी या गावातून फुले नगरसह कल्याण मार्केटला फुले पाठविली जातात.बाहेरच्या राज्यातून व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करतात़ या वर्षीही बाहेरचे व्यापारी आले. परंतु पावसाने फुलझाडे आडवी झाली, फुले खराब झाले. त्यामुळे मागणी असून फुले खराब झाल्याने नगदी उत्पन्न घटले. काही शेतक-यांचे संपूर्ण पीकच वाया गेले.मार्केटला जाणा-या फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. त्यामुळे शेतक-यांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आप्पा नरसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीRainपाऊस