शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पावसामुळे पारनेर तालुक्यातील फुल शेतीचे कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:35 IST

गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसामुळे फुलशेतीत पाणी साठलेफुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागलेफुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली.फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही

सुपा : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व सुपा परिसरातील फुल उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुले भिजल्यामुळे भाव गडगडले असून, शेतक-यांचा वाहतूक खर्चही निघत नाही़तालुक्यातील सुपा परिसर व गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. दीपावलीच्या काळातच नेमके परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे फुलशेतीत पाणी साठले तर फुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागले. काही फुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली. कल्याणला शेवंतीला दहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने फुले तोडण्याचा व वाहतुकीचाही खर्च भागत नसल्याचे पाडळी येथील फुल उत्पादक विजय धोंडिबा दावभट यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेवंती लागवडीस उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फुले उमलली नाही. या दोन्ही उत्सव काळात फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवाचे व नवरात्रोत्सवाच्या प्रत्येकी १०-१० दिवसात चांगले पैसे होतात. परंतु या वर्षी या काळात फुले न फुलल्याने उत्पन्न बुडाले. त्यानंतर दिवाळीतही पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुपा परिसरातील गावाना नगर, पुणे रोडमुळे तातडीने फुले बाजारात पाठवत येतात तर गोरेगाव, हिवरे कोर्डा, पाडळी या गावातून फुले नगरसह कल्याण मार्केटला फुले पाठविली जातात.बाहेरच्या राज्यातून व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करतात़ या वर्षीही बाहेरचे व्यापारी आले. परंतु पावसाने फुलझाडे आडवी झाली, फुले खराब झाले. त्यामुळे मागणी असून फुले खराब झाल्याने नगदी उत्पन्न घटले. काही शेतक-यांचे संपूर्ण पीकच वाया गेले.मार्केटला जाणा-या फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. त्यामुळे शेतक-यांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आप्पा नरसाळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीRainपाऊस