शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

विरोधकांनी संसदीय कामकाज चालू न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्ताधारी भाजपची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:23 IST

मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले.

ठळक मुद्देमानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला

अहमदनगर : मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, अशोक खेडकर, नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, कमलेश गांधी, गितांजली काळे, सुनील रामदासी आदींसह भाजपचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले की, संसदेचे कामकाज चालविणे ही देशवासियांप्रती लोकप्रतिनिधींची बांधिलकी असते. त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदीय कामकाजात महत्वपूर्ण मानले जाते. परंतु काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होण्यात बाधा आणली. विरोधकांच्या या आडमुठे धोरणामुळे लोकसभेचे कामकाज केवळ ४३, तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालले. म्हणजे दोन्ही सभागृहाचे एकूण तब्बल २४८ तास वाया गेले. विरोधकांच्या या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.मानधन परतविरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ दि. ०५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीतील लोकसभेतील उपस्थिती भत्ता, मानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला आहे. त्याप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनी लोकसभेच्या सचिवांना पत्र देत हे मानधन परत केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाDilip Gandhiखा. दिलीप गांधी