शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

विकासकामांतून मते मिळत नाहीत, पालकमंत्री मुश्रिफांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:14 IST

अहमदनगर : केवळ विकासकामे करून मते मिळत नाहीत. मते मिळण्यासाठी लोकांची वैयक्तिक कामे करावी लागतात. लोकांची वैयक्तिक कामे करण्याकडे ...

अहमदनगर : केवळ विकासकामे करून मते मिळत नाहीत. मते मिळण्यासाठी लोकांची वैयक्तिक कामे करावी लागतात. लोकांची वैयक्तिक कामे करण्याकडे या जिल्ह्यातील नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी येथील राष्ट्रवादी भवनात नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांचा मंगळवारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, अविनाश अदिक, सभापती क्षितीज घुले, शहराध्यक्ष माणिक विधाते, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय काेळगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजूषा गुंड, घनश्याम शेलार, आदी उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले की, शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. केवळ विकासकामे करून मते मिळत नसतात, हा आपला अनुभव आहे. एखाद्या गावासाठी रस्ता केल्यास गावाची सोय होते. परंतु, त्या गावातील गोरगरिबांची वैयक्तिक कामे मात्र होत नाहीत. ती कामे लोकप्रतिनिधींनी केली पाहिजेत. अशा प्रकारची कामे केल्यास संपर्क वाढतो. एखाद्याला ठेच आली तरी ती कळाली पाहिजे, एवढा आपला संपर्क असला पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाची अडचण आहे. ही अडचण पुढील दोन दिवसांत दूर होऊन येत्या जून महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. नगरपालिकेची निवडणूक घटक पक्षांना सोबत घेऊन लढवायची की स्वतंत्र, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. गरज पडल्यास आम्हाला सांगा. हिमालयासारखे तुमच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास मुश्रीफ यांनी दिला. जिल्हाध्यक्ष फळके यांनी नगरपालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पाथर्डी, शेवगाव, राहुरी, देवळाली, श्रीरामपूर नगरपालिकांची माहिती देण्यात आली.

फेव्हिकॉल का जोड है तुटेगा नही

सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भक्कम एकजूट आहे. ते तिन्ही पक्ष म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी हे सरकार कदापि तुटणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस