शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कुत्र्यांचा सुळसुळाट; लसींचा तुटवडा

By मिलिंदकुमार साळवे | Updated: July 14, 2018 11:49 IST

राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते. पण, या लशींचे उत्पादन करणाऱ्या पुणे येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडून या ‘रेबिज’च्या लशींचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे.नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरूवारी विधान परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातील कुत्र्यांचा तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याबाबत आमदार डॉ. सुधीर तांबे, संजय दत्त, शरद रणपिसे, हुस्नबानू खलिफे यांनी हा प्रश्न विचारला होता.अहमदनगर जिल्ह्यातील एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४० हजार २८८ श्वानदंश केलेल्या रूग्णांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०१८ च्या श्वानदंश रूग्णांच्या आकडेवारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रोज १ ते २ रूग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी येतआहेत.पुण्याच्या हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेकडून श्वान दंश प्रतिबंधक ‘रेबिज’च्या लशींचा जिल्हा सामान्य रूग्णालयास पुरवठा होतो. संस्थेकडे ९ हजार लशींची मागणी नोंदविली असताना १७५० लशींचा पुरवठा झाला आहे. त्यांचा जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उप जिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालयास पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयाकडे ८०० डोस शिल्लक आहेत. दरमहा दीड ते दोन हजार डोस लागतात. हाफकिन संस्थेत लशींचे उत्पादन होत असले तरी त्या ‘रूग्णांना वापरण्यास योग्य असे’ असे प्रमाणित होण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. मागणीच्या तुलनेत तुटवडा आहे. कुत्र्यांच्या वर्गीकरणानुसार लशी देण्याचा निर्णय डॉक्टर घेतात. पण, अनेकदा रूग्ण कुत्र्याने चाटले तरी इंजेक्शन देण्याचा आग्रह धरतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे देखील मागणी वाढते.-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगरकुत्र्यांमुळे निर्माण होणाºया वाढत्या समस्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख समिती स्थापन करण्याच्या सूचना आहेत. समितीमार्फत भटके कुत्रे पकडणे, वाहतूक करणे, निर्बिजीकरण, लसीकरण, औषधोपचार,जनजागृती अपेक्षित असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय