शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

कोरोना विषाणूमुळे झालेले आजार जगभर ४० लाख लोकांचा घास घेऊनही अजून शांत झालेले नाहीत. भारतात हा आकडा आता चार ...

कोरोना विषाणूमुळे झालेले आजार जगभर ४० लाख लोकांचा घास घेऊनही अजून शांत झालेले नाहीत. भारतात हा आकडा आता चार लाख मृत्यूच्या आसपास पोहोचतोय. महाराष्ट्राने कालच एक लाख आकडा पार केला आहे. म्हणजे पानिपत युद्धापेक्षा जास्त.

आपल्यापैकी एकही माणूस असा नाही की ज्याच्या ओळखीच्या घरात मृत्यू झाला नाही.

अनेकांना आपल्या प्रथेप्रमाणे योग्य अंत्यसंस्कार मिळाले नाहीत.

नातेवाइकांना शोक व्यक्त करणे, शोकात सहभागी होणे आणि शोक काढणे याप्रमाणे मानसिक आधार देता आला नाही.

मानसशास्त्र सांगते की, शोक व्यक्त करायला मिळणे हे गरजेचे असते. त्याशिवाय मनाच्या जखमा भरून येत नाहीत. शोकग्रस्त व्यक्तीला त्यांच्या स्वभावाप्रमाणे शोक व्यक्त करू द्यावा. शोक दाबून टाकणे, व्यक्त करू न देणे यामुळे मनावर दूरगामी आणि घातक परिणाम होतात.

जवळच्या व्यक्तीपाशी मोकळे होणे याला पर्याय नाही.

मृत व्यक्तीची वारंवार आठवण येणे, पुन्हा पुन्हा भरून येणे, आपले काही चुकले का? राहून गेले का? कोणाचा दोष आहे?, असे विचार येणे हे नैसर्गिक आहे.

आपण मागे शिल्लक राहिल्याची खंत वाटणे हा सुद्धा शोकाचा भाग आहे.

लहान मुलांना योग्य त्या भाषेत सत्य सांगणे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य आणि खरी उत्तरे देणे योग्य आहे.

अनेकांच्या बाबतीत ही प्रक्रिया जवळजवळ वर्षभर चालते.

पहिल्या काही आठवड्यानंतर झोप आणि भूक ठिकाणावर येत नसेल किंवा दु:ख अनावर राहत असेल तर मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला जरूर घ्यावा.

नैसर्गिक शोकाचे रूपांतर कायमस्वरूपी उदासीनतेमध्ये होऊ नये, यासाठी समुपदेशनाची मदत शिघ्र घ्यावी.

एकमेकांना आधार देऊन नाते आणि मैत्री निभावणे ही या अवघड काळाची गरज आहे. जवळच्या व्यक्तीने मनातील विचार शांतपणे ऐकून घेणे हा सर्वांत मोठा आधार आहे.

सतत सल्ले देणे आणि सगळे ठीक होईल, अशा प्रकारची वाक्ये सतत बोलणे याने मदत कमी आणि हानी जास्त होते. भाविक स्वभाव नसलेल्या व्यक्तीला परमेश्वर, अध्यात्म वगैरे सल्ल्यांचा मनस्ताप जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे भेटायला जाताना तारतम्य बाळगावे.

- डॉ. भूषण शुक्ल, बाल-मानसोपचार तज्ज्ञ

------------