शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही

By admin | Updated: April 25, 2016 23:23 IST

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने शेतकरी खचला आहे़ त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध होतील, याची काळजी प्रशासनाने घ्यावी़

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने शेतकरी खचला आहे़ त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध होतील, याची काळजी प्रशासनाने घ्यावी़ कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तशा तक्रारी प्राप्त झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराच पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिला आहे़पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पाडली़ जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, आ़ शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी यावेळी उपस्थित होते़ सुलभ पीक कर्ज योजनेसाठी जिल्ह्यातील ८ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत़ खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे़ त्यादृष्टीने खरीप हंगामात बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे़ जिल्ह्यात खरीप हंगामातील ५ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून, त्यासाठी लागणारे खत शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून देण्यावर भर आहे़ शेतकऱ्यांच्या कंपन्या आणि गटांमार्फत ते पुरविले जाणार आहे़ यंदा प्रथम निमकोटेड युरिया उपलब्ध होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी १० टक्के युरियाचा कमी वापर करावा़ जिल्ह्यातील युरियाची मागणी मोठी आहे़ मागणीप्रमाणे युरियाचा पुरवठा करण्यात येईल़ वेळप्रसंगी सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले़ खरीप हंगामात बाजारात येणाऱ्या खते व बियाणांवर गुण नियंत्रक विभागाचे नियंत्रण असणार आहे़ त्याचबरोबर कृषी, महसूल आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र नियोजन करून त्यानुसार शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावेत़ शेतकरी आधीच दुष्काळाने खचला आहे़ यंदाच्या हंगामात उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे़ शेतकरी आशावादी असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे, त्यात कसूर होणार नाही़ चुकीचे काम करणाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार खपवून घेणार नाही, अशी तंबी शिंदे यावेळी अधिकाऱ्यांना दिली़ (प्रतिनिधी)आंदोलनकर्त्या सेनेला केले लक्ष्यछावण्या सुरू करण्यासाठी आंदोलने केली़ मात्र परिपूर्ण प्रस्ताव देण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही़ त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव दाखल करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी टीका शिंदे यांनी सेनेने केलेल्या आंदोलनाचा थेट उल्लेख न करता केली़ ७३ हजार ५१७ क्विंटल बियाणेभात- २ हजार ८५१, ज्वारी-३०, बाजरी-५ हजार ५४९, मका- १३ हजार ७६७, तूर- १ हजार २४, मूग-१ हजार ६९०, उडीद-२ हजार ६१८, भुईमूग-१ हजार ५००, सोयाबीन- ४२ हजार ११, कापूस- २ हजार १६०खरीप पिकासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार मेट्रीक टना खताची आवश्यकता भासणार आहे़ त्यानुसार मागणी करण्यात आली आहे़ युरिया ६० हजार ८५६ मेट्रीक टन लागेल़ त्यापैकी केंद्रातर्फे ५० हजार मेट्रीक टन उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे युरियाची अडचणी येऊ शकते, असाही अंदाज आहे़ याशिवाय डीएपी-४ हजार ५७२, एमओपी-६ हजार ३३६, एसएसपी-९ हजार ५९ मेट्रीक टन खतांची गरज भासणार आहे़