शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पाच दिवस जिल्हा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:19 IST

अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

राहुरी : अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता़ मात्र प्रत्यक्षात दोन सव्वादोन महिन्यात पावसाने ठेंगा दाखविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत़ मुळा व भंडारदरा या धरणाशिवाय छोट्या, मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी पावसाने दडी मारली आहे़ याशिवाय जायकवाडीला पाणी जाण्याची भीती शेतकºयांना आहे़ दुसºया बाजूला ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ हवामानावर आधारित विद्यापीठाने शेतकºयांना सल्ला दिला आहे़ लाल बोंडअळी आढळून आल्यास कामगंध सापळे लावण्याचा शेतकºयांना सल्ला देण्यात आला आहे़ तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे मूग व उडीद पिकांवर मावा, तुडतुडे व पांढरी माशी आढळून आल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे़सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास १२ मिली ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे़ तूर या पिकावर शेंडे गुंडाळणारी अळी व पाने कुडतडणाºया अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४़५ टक्के प्रवाही ७ मिली किंवा स्पीनोसॅड ४५ टक्के प्रवाही तीन मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे़पावसाने ओढ दिल्याने पिके सुकलीबोटा : पावसाने ओढ दिल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांसह माळरानावर चाराही सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पठारभागात सुरवातीला वळवाचा दमदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे आगमन लांबले. यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाचे ओलीवर बोटा, घारगाव, साकूर व इतर गावांमध्ये शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग आदींसह कडधान्ये या पिकांच्या पेरण्या उरकल्या. सारोळेपठार नांदुर-खंदरमाळ व लगतच्या गावामध्ये लाल सेद्रीय कांदा पिकांच्या पेरण्याही झाल्या.दरम्यान पठारभागातील बहुतांश क्षेत्र हे पावसावरच अवलंबून आहे. त्यातच पावसाने काही दिवसांपासून ओढ दिल्याने साकूर उत्तर भागातील खांबे, वरवंडी, कौठे, मलकापूर, हिवरगाव पठार, रणखांब व लगतच्या गावांमध्ये खरीप पिके सुकू लागली आहेत. माळरानावरील चाराही सुकू लागला आहे.यामुळे या गावांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मुळा नदी परिसर व बोटा, घारगाव परिसरातील पिक परिस्थिती समाधानकारक असली तरी येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सीअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील़ किमान आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील़ वाºयाचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील़ -रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस