शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

पुढील पाच दिवस जिल्हा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:19 IST

अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

राहुरी : अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता़ मात्र प्रत्यक्षात दोन सव्वादोन महिन्यात पावसाने ठेंगा दाखविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत़ मुळा व भंडारदरा या धरणाशिवाय छोट्या, मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी पावसाने दडी मारली आहे़ याशिवाय जायकवाडीला पाणी जाण्याची भीती शेतकºयांना आहे़ दुसºया बाजूला ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ हवामानावर आधारित विद्यापीठाने शेतकºयांना सल्ला दिला आहे़ लाल बोंडअळी आढळून आल्यास कामगंध सापळे लावण्याचा शेतकºयांना सल्ला देण्यात आला आहे़ तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे मूग व उडीद पिकांवर मावा, तुडतुडे व पांढरी माशी आढळून आल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे़सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास १२ मिली ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे़ तूर या पिकावर शेंडे गुंडाळणारी अळी व पाने कुडतडणाºया अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४़५ टक्के प्रवाही ७ मिली किंवा स्पीनोसॅड ४५ टक्के प्रवाही तीन मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे़पावसाने ओढ दिल्याने पिके सुकलीबोटा : पावसाने ओढ दिल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांसह माळरानावर चाराही सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पठारभागात सुरवातीला वळवाचा दमदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे आगमन लांबले. यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाचे ओलीवर बोटा, घारगाव, साकूर व इतर गावांमध्ये शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग आदींसह कडधान्ये या पिकांच्या पेरण्या उरकल्या. सारोळेपठार नांदुर-खंदरमाळ व लगतच्या गावामध्ये लाल सेद्रीय कांदा पिकांच्या पेरण्याही झाल्या.दरम्यान पठारभागातील बहुतांश क्षेत्र हे पावसावरच अवलंबून आहे. त्यातच पावसाने काही दिवसांपासून ओढ दिल्याने साकूर उत्तर भागातील खांबे, वरवंडी, कौठे, मलकापूर, हिवरगाव पठार, रणखांब व लगतच्या गावांमध्ये खरीप पिके सुकू लागली आहेत. माळरानावरील चाराही सुकू लागला आहे.यामुळे या गावांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मुळा नदी परिसर व बोटा, घारगाव परिसरातील पिक परिस्थिती समाधानकारक असली तरी येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सीअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील़ किमान आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील़ वाºयाचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील़ -रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस