शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जि. प., पंचायत समिती होणार ‘वीज बिल मुक्त’

By admin | Updated: April 15, 2016 23:11 IST

ज्ञानेश दुधाडे ल्ल अहमदनगर ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

पारेषण विरहित ऊर्जा निर्मितीचा प्रयोग : बँकिंग आॅफ इलेक्ट्रीसीटी योजना राबवणारज्ञानेश दुधाडे ल्ल अहमदनगरऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यासाठी मुबलक प्रमाणात असणाऱ्या सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून पारेषण विरहित ऊर्जा प्रकल्प राबवण्यास सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यालयात हा प्रयोग राबवून ‘वीज बिल मुक्ती’कडे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर कर्जत पंचायत समितीच्या इमारतीत हा प्रयोग राबवण्यात येत आहे. बँकिंग आॅफ इलेक्ट्रीसीटीवर आधारित हा प्रयोग असून सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येत आहे. त्यानंतर ती वीज वितरणला देऊ, त्यांच्याकडून गरजेनुसार वीज घेण्यात येत आहे. कर्जत पंचायत समितीच्या इमारतीत सौर ऊर्जेवर आधारित दररोज १० किलोवॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. यातून ५० युनिट विजेची निर्मिती होत असून ही वीज मीटर लावून एमएसईबीला (महावितरण) देण्यात येत आहे. यातून पंचायत समितीला आवश्यक असणारा विजेचा पुरवठा होत आहे. यामुळे कर्जत पंचायत समिती इमारतही ‘वीज बिल मुक्त’ झाली आहे. या प्रकल्पासाठी १३ ते १४ लाख रुपये खर्च आला आहे. जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्यातील उर्वरित १३ पंचायत समिती इमारतीत हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीचा वीज प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी ३० किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची फाईल मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. सरकारकडून या प्रकल्पासाठी ३० टक्के सबसिडी देण्यात येत आहे. भविष्यात हा प्रयोग ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय या ठिकाणी राबवण्यात येणार असून त्या ठिकाणचे वीज बिल बंद अथवा अल्प प्रमाणात करून घेण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे. शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेपासून तयार होणारी वीज ही वर्षातून अवघ्या ३०० दिवस वापरण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी तयार होणारी वीज ही महावितरणला वितरीत होणार आहे. यातून संंबंधीत शासकीय कार्यालयाला स्वतंत्रपणे उत्पन्न उपलब्ध होणार आहे. खासगी स्तरावरही प्रत्येक कु टुंबाला १ किलोवॅटचा प्रकल्प उभारता येणार आहे. यासाठी १ लाख ३० हजार रुपये खर्च असून त्याला सरकारकडून ३० टक्के सबसीडी राहणार आहे. सरकारने ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेवून सौर ऊर्जेतून वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालयांसोबत सामान्य व्यक्तींना त्यांच्या घरात १ किलोवॅट सौर वीज प्रकल्प उभारता येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा. -डॉ. अशोक कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.