शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चार लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:49 IST

कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा मार्चमध्येच बंद झाल्याने शाळेत पोषण आहार शिजला नाही. परिणामी एप्रिल-मे मध्ये शिक्षकांनी हा पोषण आहार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ५११ विद्यार्थ्यांना वाटप केला. यात १९ हजार ३६९ क्विंटल तांदूळ, तर ४ हजार ८३३ क्विंटल डाळी- कडधान्याचा समावेश आहे.

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा मार्चमध्येच बंद झाल्याने शाळेत पोषण आहार शिजला नाही. परिणामी एप्रिल-मे मध्ये शिक्षकांनी हा पोषण आहार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ५११ विद्यार्थ्यांना वाटप केला. यात १९ हजार ३६९ क्विंटल तांदूळ, तर ४ हजार ८३३ क्विंटल डाळी- कडधान्याचा समावेश आहे.

 शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना पोषण आहार दिला जातो. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा मार्चमध्येच बंद करण्यात आल्या. त्यामुळे पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शिक्षकांनी या पोषण आहाराचे वाटप पालकांना शाळेत बोलावून केले. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षकांनी पोषण आहाराचे बरेचसे वाटप केले. काही ठिकाणी पोषण आहार मे मध्ये वाटप करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक पोषण आहार संगमनेर व शेवगाव तालुक्यात वाटप करण्यात आला, तर सर्वात कमी पोषण आहार जामखेडमध्ये वाटप झाला.पोषण आहारमध्ये प्रमुख्याने तांदूळ व डाळी-कडधान्य (मूग,तूर, मटकी) याचे वाटप करण्यात आले. 

मसाले वाटप नाही पोषण आहार वाटप करताना शिक्षकांनी तांदूळ डाळी व कडधान्याचे वाटप केले आहे़ पॅकिंग वस्तू जसे मसाले, मीठ, तेल याचे वाटप केलेले नाही. या वस्तू आणखी काही दिवस टिकणार असून पुन्हा वापरात येतील, असा शिक्षण विभागाचा कयास आहे.

फेब्रुवारी, मार्चपर्यंत पोषण आहार शाळांकडे आलेला होता. १७ मार्चपर्यंत पोषण आहार शाळेमध्ये वाटला. त्यानंतर शाळा बंद झाल्या. त्यामुळे उरलेला पोषण आहार एप्रिलमध्ये वाटप करण्यात आला. तेव्हापासून नवीन पोषण आहार शासनाकडून मिळालेला नाही़    - रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद